अ‍ॅपशहर

अहमद पटेल भडकले; आनंद शर्मा, मुकुल वासनिकांसह इतर नेत्यांनाही घेतलं फैलावर

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी आनंद शर्मांवर हल्लाबोल केला. सोनिया गांधींना लिहिल्या पत्रामागे आनंद शर्मा असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढचं नव्हेत तर पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांवरही निशाणा साधला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2020, 2:23 am
नवी दल्लीः कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी कायम स्वरुपी अध्यक्ष आणि ताकदवर नेतृत्वासह पक्षात फेररचना करण्याची आवश्यकता आहे, असं पत्र काही वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलं होतं. या पत्रावरून वाद थांबत नाही. या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी कॉंग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी आनंद शर्मांवर पत्र लिहिल्याचा आरोप करत खेद व्यक्त केला. या पत्रावर स्वाक्षरी करणार्‍यांमध्ये गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि आनंद शर्मा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ahmed patel : अहमद पटेलांचा हल्लाबोल; आनंद शर्मा, मुकुल वासनिकसह इतर नेतेही निशाण्यावर


हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम राहतील

कॉंग्रेस कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी या हंगामी अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसंच येत्या ४ ते ६ महिन्यांत अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसने सदस्यता अभियानही सुरू करावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हे पत्र दुर्दैवी असल्याचं म्हटलं. तर ए. के. अँन्टोनी यांनी हे पत्र क्रूर असल्याचं भाष्य केलं.

४५ वर्षे फक्त यासाठीच गुलामी केली? ओवैसींचा गुलाम नबी आझादांना सवाल

अंबिका सोनी यांनी कारवाईची मागणी केली

पत्र लिहिणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी CWC च्या बैठकीत अंबिका सोनी यांनी केली. ज्या कुणी शिस्तभंग केला आहे त्याच्यावर पक्षाच्या घटनेनुसार कारवाई केली जावी, असं सोनी म्हणाल्या.

सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी कायम, काँग्रेस कार्यकारिणीचा निर्णय

राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करा, नेत्याने लिहिलं रक्ताने पत्र
यामुळे बैठक बोलवण्यात आली

CWC ची ही बैठक २ आठवड्यांपूर्वी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्र वादावरून बोलवण्यात आली होती. CWC चे काही सदस्य, यूपीए सरकारमधील नेते आणि मंत्री यांच्यासह किमान २३ नेत्यांनी पक्ष संघटनेच्या विषयावर सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं. सशक्त नेतृत्वासह पक्ष चालवण्यासाठी योग्य रणनीतीवर जोर देण्यात आला होता. पक्षाचं नेतृत्व हे सक्रिय आणि प्रत्यक्ष काम करताना दिसून आले पाहिजे, असं पत्रात म्हटलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज