अ‍ॅपशहर

‘काँग्रेसचे जातीय राजकारण’

काँग्रेसकडून जातीय राजकारणाला खतपाणी घातले जात आहे, काँग्रेसकडून राजकारणाचा नवा नीचांक गाठण्यात आला असून हा पक्ष सर्व प्रकारचे सौजन्य विसरला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

PTI 26 Nov 2018, 4:12 am
वृत्तसंस्था, अलवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress plays caste politics narendra modi
‘काँग्रेसचे जातीय राजकारण’


काँग्रेसकडून जातीय राजकारणाला खतपाणी घातले जात आहे, काँग्रेसकडून राजकारणाचा नवा नीचांक गाठण्यात आला असून हा पक्ष सर्व प्रकारचे सौजन्य विसरला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना घाबरविण्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला. काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडतो; तसेच त्यांच्याकडून के‌‌वळ एकाच कुटुंबातील सदस्यांना भारतरत्न सन्मान दिला जातो, अशी टीकाही मोदींनी केली.

न्यायव्यवस्थेला राजकारणात ओढण्याचा आरोप काँग्रेसवर त्यांनी या वेळी केला. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश काँग्रेसच्या राजकारणानुसार वागले नाहीत, तर त्यांना धमकावले जाते, असा आरोप मोदींनी केला. 'तुम्ही न घाबरता न्यायाच्या मार्गावर चालत राहा, असे मी न्यायाधीशांना सांगेन,' असे ते पुढे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज