नवी दिल्ली:
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारत सरकारनं केलेल्या कारवाईला राजकीय वर्तुळातून जोरदार पाठिंबा मिळत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलाच्या लढवय्या वैमानिकांना सॅल्यूट ठोकला आहे.
पुलवामा येथील पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. मात्र, सरकारनं कोणतीही घाई करण्याची भूमिका घेतली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकची कोंडी केल्यानंतर १२ दिवसांनी आज पहाटे भारतीय हवाई दलानं बालाकोट येथील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात 'जैश'चे तीन तळ व कंट्रोल रूम उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे. तसंच, सुमारे २०० दहशतवादी मारले गेल्याचं सांगण्यात येत आहे.
या कारवाईनंतर भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 'भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना माझा सलाम...' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी भारताच्या कारवाईचं जोरदार समर्थन केलं आहे. 'पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यामुळं आपण तिथं कधीही बॉम्ब टाकू शकतो. यात काहीही चुकीचं नाही आणि आपण त्यांच्या हद्दीत घुसलो असलो तरी त्यानं काही बिघडत नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमांनुसार, प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. पाकिस्तान भारताचे हजार तुकडे करण्याच्या घोषणा करतो. त्यामुळं त्यांच्यावर हजार किलोचे बॉम्ब टाकण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे,' असं स्वामी म्हणाले.
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारत सरकारनं केलेल्या कारवाईला राजकीय वर्तुळातून जोरदार पाठिंबा मिळत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलाच्या लढवय्या वैमानिकांना सॅल्यूट ठोकला आहे.
पुलवामा येथील पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. मात्र, सरकारनं कोणतीही घाई करण्याची भूमिका घेतली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकची कोंडी केल्यानंतर १२ दिवसांनी आज पहाटे भारतीय हवाई दलानं बालाकोट येथील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात 'जैश'चे तीन तळ व कंट्रोल रूम उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे. तसंच, सुमारे २०० दहशतवादी मारले गेल्याचं सांगण्यात येत आहे.
या कारवाईनंतर भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 'भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना माझा सलाम...' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी भारताच्या कारवाईचं जोरदार समर्थन केलं आहे. 'पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यामुळं आपण तिथं कधीही बॉम्ब टाकू शकतो. यात काहीही चुकीचं नाही आणि आपण त्यांच्या हद्दीत घुसलो असलो तरी त्यानं काही बिघडत नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमांनुसार, प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. पाकिस्तान भारताचे हजार तुकडे करण्याच्या घोषणा करतो. त्यामुळं त्यांच्यावर हजार किलोचे बॉम्ब टाकण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे,' असं स्वामी म्हणाले.