अ‍ॅपशहर

महिला आरक्षणासंबंधी राहुल गांधींचं मोदींना पत्र

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं. या विधेयकाला काँग्रेस बिनशर्त पाठिंबा देईल, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2018, 2:09 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi-and-rahul-gandhi


संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं. या विधेयकाला काँग्रेस बिनशर्त पाठिंबा देईल, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं, अशी मागणी राहुल गांधी यांनी मोदींकडे केली आहे. संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळायला हवं, असं राहुल यांनी म्हटलं आहे. यासंबंधी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही गेल्या वर्षी केंद्र सरकारला पत्र लिहलं होतं. दरम्यान, महिला आरक्षण विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं आहे. १९९६ मध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कार्यकाळात हे विधेयक संसेदत मांडलं होतं. २०१०मध्ये राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊनही लोकसभेत मंजूर होऊ शकलं नव्हतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज