वृत्तसंस्था, भुवनेश्वर
'लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी घराणेशाहीचे राजकारण नाकारले, मात्र काँग्रेसने त्यापासून कोणताही धडा घेतलेला नाही. काँग्रेसजनांना अद्यापही पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांनीच करावे असेच वाटते', अशी टीका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी केली.
काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी सोनिया गांधी यांची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली. त्यावर टीका करताना चौहान म्हणाले की, भाजपमध्ये विविध नेत्यांना वाव दिला जातो, मात्र काँग्रेस एका घराण्यापलिकडे जाऊच शकत नाही. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेसने धडा घेतला असेल असे मला वाटले होते, परंतु काँग्रेस कार्यकारिणीला अद्यापही सोनिया किंवा राहुल यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे असे वाटणे हे आश्चर्यकारक आहे. राहुल गांधी यांची 'रणछोड' अशी संभावना करीत चौहान म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षाला निराशेच्या गर्तेत सोडून पळ काढणे पसंत केले.
काँग्रेस नेत्यांनी केले स्वागत
चंदिगढ : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्याच्या निर्णयाचे पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रविवारी स्वागत केले. वर्तमान परिस्थितीत हा उत्तम निर्णय असून सोनिया गांधी यांचा अनुभव आणि समज याचा फायदा पक्षाला होणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. पंजाब आणि हरयाणामधील अन्य काँग्रेस नेत्यांनी देखील सोनिया यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करीत सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.
'लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी घराणेशाहीचे राजकारण नाकारले, मात्र काँग्रेसने त्यापासून कोणताही धडा घेतलेला नाही. काँग्रेसजनांना अद्यापही पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांनीच करावे असेच वाटते', अशी टीका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी केली.
काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी सोनिया गांधी यांची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली. त्यावर टीका करताना चौहान म्हणाले की, भाजपमध्ये विविध नेत्यांना वाव दिला जातो, मात्र काँग्रेस एका घराण्यापलिकडे जाऊच शकत नाही. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेसने धडा घेतला असेल असे मला वाटले होते, परंतु काँग्रेस कार्यकारिणीला अद्यापही सोनिया किंवा राहुल यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे असे वाटणे हे आश्चर्यकारक आहे. राहुल गांधी यांची 'रणछोड' अशी संभावना करीत चौहान म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षाला निराशेच्या गर्तेत सोडून पळ काढणे पसंत केले.
काँग्रेस नेत्यांनी केले स्वागत
चंदिगढ : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्याच्या निर्णयाचे पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रविवारी स्वागत केले. वर्तमान परिस्थितीत हा उत्तम निर्णय असून सोनिया गांधी यांचा अनुभव आणि समज याचा फायदा पक्षाला होणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. पंजाब आणि हरयाणामधील अन्य काँग्रेस नेत्यांनी देखील सोनिया यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करीत सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.