अ‍ॅपशहर

काँग्रेसकडून जवानांचा अपमान, मोदींचा घणाघात

‘काँग्रेसने ‘वन रँक, वन पेन्शन’ गेली ४० वर्षे लटकवत ठेवले. तसेच, ‘सर्जिकल स्ट्राइक’वर शंका उपस्थित करून जवानांचा अपमान केला आहे. जवानांचा अपमान करणाऱ्या आणि तुमच्या जीवनाशी खेळ करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सैन्यबहुल उत्तराखंडमधील प्रचारसभेत केले.

Maharashtra Times 13 Feb 2017, 2:58 am
वृत्तसंस्था, पिठोरगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress turned uttarakhand from dev bhoomi to loot bhoomi pm modi
काँग्रेसकडून जवानांचा अपमान, मोदींचा घणाघात


‘काँग्रेसने ‘वन रँक, वन पेन्शन’ गेली ४० वर्षे लटकवत ठेवले. तसेच, ‘सर्जिकल स्ट्राइक’वर शंका उपस्थित करून जवानांचा अपमान केला आहे. जवानांचा अपमान करणाऱ्या आणि तुमच्या जीवनाशी खेळ करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सैन्यबहुल उत्तराखंडमधील प्रचारसभेत केले.

उत्तराखंड विधानसभेसाठी १५ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, प्रचार अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी पंतप्रधान मोदी यांनी पिठोरगडमध्ये आयोजित रॅलीत काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला करीत निवडणुकीत भाजपला सत्ता देण्याचे आवाहन केले. उत्तराखंड हे सैन्यबहुल असल्याने पंतप्रधानांनी जवानांच्या मुद्द्यावर भर देत जनतेला भावनिक आवाहन केले. ‘काँग्रेसने ४० ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना गेल्या ४० वर्षांपासून लटकवत ठेवले. जवानांसाठीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय न घेता केवळ झोपा काढले का? त्यांना सैन्याबद्दल अजिबात सन्मान नाही. म्हणूनच, त्यांच्याकडून ‘सर्जिकल स्ट्राइक’वर प्रश्न उपस्थित करून सैन्यांचा अपमान करण्यात आला,’ असा आरोप मोदी यांनी केला.

‘उत्तराखंडचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आतापर्यंत उत्तराखंडच्या विरोधातच काम केले आहे. हे मुख्यमंत्री मागील दरवाजातून आत आले आहेत, अन्यथा जनतेने त्यांना मुख्यमंत्री केलेच नसते. उत्तराखंडमध्येही काँग्रेस आणि समाजवादी पक्ष पडद्याआडून राजकारण करीत आहेत. ही निवडणूक केवळ मुख्यमंत्र्यांना शिक्षा देण्यासाठी नसून, उत्तराखंडचे भविष्य बदलणारी आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडची निर्मिती केली. उत्तराखंडमध्ये विकासझेप घेण्याची क्षमता असतानाही हे राज्य मागे का राहिले? माओवाद्यांचा प्रभाव असतानाही भाजपच्या नेतृत्वाखालील छत्तीसगड जोमाने विकास करीत आहे. झारखंड मागास राज्य असले, तरी भाजपच्या नेतृत्वाखाली येथे गुंतवणूकदार आकृष्ट होत आहेत. मग, उत्तराखंडचा विकास का होऊ शकत नाही,’ असा सवालही मोदी यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज