नवी दिल्ली, वृत्तसंस्था :
देशभरात करोनाबाधित झालेल्यांची संख्या वाढत असतानाच करोनाविषयक नवनव्या अफवांमुळे लोक भयभीत झाले आहेत. त्यामुळेच आरोग्य मंत्रालयाने, करोनाविषयीच्या गैरसमजाविषयी माहिती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात डास चावल्यामुळे करोना विषाणूंच्या संसर्गाचा प्रसार होऊ शकत नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली आहे.
'करोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरायला हवेत, असाही समज पसरला आहे. यावर आरोग्य मंत्रालयाने, ज्यांना ताप, खोकला आणि सर्दीची लक्षणे आहेत किंवा आरोग्यसेवा करणारे आहेत आणि घरातील अन्य व्यक्तींची काळजी घेत अशाच व्यक्तींनी मास्क वापरावा,' असे स्पष्ट केले आहे.
श्वसन विषाणूजन्य संसर्गामुळे दहा लोकांचा मृत्यू झाला असून देशभरात सहाशेपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असल्याच्या अफवेबाबतही मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. कोव्हिड १९ ची लक्षणे असलेलली व्यक्तीच हा आजार पसरवू शकतात, हीदेखील चुकीची समजूत आहे. कोव्हिड १९ संसर्ग झालेले आहेत, परंतु ज्यांच्यात श्वसनसंबंधी आजारांची लक्षणही दिसत नाही, त्यांच्यामार्फत या आजाराचा संसर्ग होऊ शकतो, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
लसूण खाल्ल्याने किंवा आणि मद्यपान केल्याने करोनाचा प्रतिबंध करता येतो, हेदेखील मिथकच असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देशभरात करोनाबाधित झालेल्यांची संख्या वाढत असतानाच करोनाविषयक नवनव्या अफवांमुळे लोक भयभीत झाले आहेत. त्यामुळेच आरोग्य मंत्रालयाने, करोनाविषयीच्या गैरसमजाविषयी माहिती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात डास चावल्यामुळे करोना विषाणूंच्या संसर्गाचा प्रसार होऊ शकत नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली आहे.
'करोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरायला हवेत, असाही समज पसरला आहे. यावर आरोग्य मंत्रालयाने, ज्यांना ताप, खोकला आणि सर्दीची लक्षणे आहेत किंवा आरोग्यसेवा करणारे आहेत आणि घरातील अन्य व्यक्तींची काळजी घेत अशाच व्यक्तींनी मास्क वापरावा,' असे स्पष्ट केले आहे.
श्वसन विषाणूजन्य संसर्गामुळे दहा लोकांचा मृत्यू झाला असून देशभरात सहाशेपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असल्याच्या अफवेबाबतही मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. कोव्हिड १९ ची लक्षणे असलेलली व्यक्तीच हा आजार पसरवू शकतात, हीदेखील चुकीची समजूत आहे. कोव्हिड १९ संसर्ग झालेले आहेत, परंतु ज्यांच्यात श्वसनसंबंधी आजारांची लक्षणही दिसत नाही, त्यांच्यामार्फत या आजाराचा संसर्ग होऊ शकतो, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
लसूण खाल्ल्याने किंवा आणि मद्यपान केल्याने करोनाचा प्रतिबंध करता येतो, हेदेखील मिथकच असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.