अ‍ॅपशहर

coronavirus: करोना संसर्गाबाबत आली गुड न्यूज; 'हा' आहे रिकव्हरी दर

भारतातील करोनाची लागण झालेले रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत. आता पर्यंत देशात एकूण करोनारुग्णांपैकी १८ लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तसेच गेल्या २४ तासात ५७ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Aug 2020, 7:21 pm
नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा (CoronaVirus) संसर्ग वाढत असताना, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्ण बरे होण्याची गतीही (Recovery Rate) चांगली आहे. देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत १.८ दशलक्षाहून अधिक लोक बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ५७,३८१ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यानंतर करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ७१.६१ टक्क्यावर पोहोचला. (corona patients in the country are recovering fast)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारतात करोनारुग्ण जलद होत आहेत बरे


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ८ लाख ६८ हजार ६७० लोकांची तपासणी करण्यात आली. याबरोबर आतापर्यंत एकूण २ कोटी ८५ लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

राज्यांच्या स्थितीवर एक नजर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. तसेच, देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांहून अधिक आहे. दिल्लीतील रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक म्हणजे ८९.८७ टक्के इतका आहे.

त्याखालोखाल तामिळनाडूत ८१.६२ टक्के, गुजरात ७७.५३ टक्के, मध्य प्रदेश. ७४.७० टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७३.२५ टक्के, राजस्थानात ७२.८४ टक्के, तेलंगणात ७२.७२ टक्के आणि ओडिशात ७१.९८ टक्के इतका आहे. रूग्णांना बरे करून आणि रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर, संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून ती १८ लाख, ०८ हजार आणि ९३६ इतकी झाली आहे.

नक्की पाहा- करोना Live:देशातील रुग्णांची संख्या २६ लाखांच्या पुढे
मृत्युदरात घसरण

आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या ६ लाख ६८ हजार २२० लोकांवर उपचार सुरू आहेत. हे रुग्णांचे प्रणाम एकूण रुग्णांच्या २६.४५ टक्के इतके आहेत. भारताचा मृत्यू दर जागतिक सरासरीपेक्षा कमीच असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारताचा हा दर सध्या १.९४ टक्के इतका आहे.

वाचा- डिजिटल आरोग्य अभियान: आता देशातील प्रत्येक नागरिकाचे बनणार आरोग्य कार्ड
आरोग्य मंत्रालयाने आज रविवारी सकाळी ८ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात कोविड -१९चे एकूण ६५ हजार ००२ इतके नवे रुग्ण आढळले. त्यानंतर देशात ज्यांना करोनाची लागण झाली, अशा लोकांची संख्या २५ लाख २६ हजार १९२ इतकी झाली. तर करोनामुळे गेल्या २४ तासात एकूण ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला. तर करोनामुळे आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ४९ हजार ०३६ वर पोहोचली आहे.

वाचा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा करोना रिपोर्ट निगेटीव्ह, काही दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज