नवी दिल्ली : इटलीमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी आणि त्यांना मायदेशात परत आणण्यासाठी एअर इंडियाचं एक विशेष विमान धाडण्यात आलंय. शनिवारी सायंकाळी ४.०० वाजल्या दरम्यान हे विमान भारतातून रवाना झालं. या विमानातून जवळपास २२० प्रवाशांना मायदेशी परत आणण्यात येईल. रविवारी सकाळी हे विमान भारतात दाखल होईल. करोना व्हायरसच्या संक्रमणामुळे हे लोक इटलीमध्ये अडकले आहेत. यामध्ये, इटलीच्या महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
इटलीमधल्या भारतीयांना भारतात परत आणण्यापूर्वी त्यांच्या करोना तपासणीसाठी एक मेडिकल टीम अगोदरच पाठवण्यात आलीय. या भारतीयांची शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी स्क्रिनिंग करण्यात आली. भारतात परतण्यासाठी आतूर असलेले हे विद्यार्थी भारतीय दूतावासाबाहेर स्क्रिनिंग प्रक्रियेसाठी रांगेत उभे राहिलेले दिसले.
भारतीय दूतावासात कोविड १९ टेस्टसाठी मदत करणाऱ्या मेडिकल टीम, दूतावासाचे कर्मचारी आणि स्वयंसेवी विद्यार्थ्यांचे आभार. तसेच शहर बंद असूनही अशी सुविधा देणाऱ्या इटली प्रशासनाचेही आभार, असं ट्विट दूतावासाकडून करण्यात आलं.
उल्लेखनीय म्हणजे, करोना व्हायरसमुळे चीननंतर सर्वात जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इथं १००० हून अधिक जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
इटलीनंतर नंबर लागतो तो ईराणचा... तिथूनही भारतीयांना मायदेशात सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. पहिल्या गटात भारतीय हवाईदलानं ५८ भारतीयांना दिल्लीत आणलंय तर दुसऱ्या गटात ४४ जण भारतात परतण्याची संधी मिळालीय.
इटलीमधल्या भारतीयांना भारतात परत आणण्यापूर्वी त्यांच्या करोना तपासणीसाठी एक मेडिकल टीम अगोदरच पाठवण्यात आलीय. या भारतीयांची शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी स्क्रिनिंग करण्यात आली. भारतात परतण्यासाठी आतूर असलेले हे विद्यार्थी भारतीय दूतावासाबाहेर स्क्रिनिंग प्रक्रियेसाठी रांगेत उभे राहिलेले दिसले.
भारतीय दूतावासात कोविड १९ टेस्टसाठी मदत करणाऱ्या मेडिकल टीम, दूतावासाचे कर्मचारी आणि स्वयंसेवी विद्यार्थ्यांचे आभार. तसेच शहर बंद असूनही अशी सुविधा देणाऱ्या इटली प्रशासनाचेही आभार, असं ट्विट दूतावासाकडून करण्यात आलं.
उल्लेखनीय म्हणजे, करोना व्हायरसमुळे चीननंतर सर्वात जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इथं १००० हून अधिक जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
इटलीनंतर नंबर लागतो तो ईराणचा... तिथूनही भारतीयांना मायदेशात सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. पहिल्या गटात भारतीय हवाईदलानं ५८ भारतीयांना दिल्लीत आणलंय तर दुसऱ्या गटात ४४ जण भारतात परतण्याची संधी मिळालीय.