पाटणा : बिहारमध्ये करोना मृत्यूंच्या आकड्यातील धक्कादायक फेरफार समोर आला आहे. गेल्या २४ तासांत करोना मृत्यूचा आकडा ५४५८ वरून थेट ९४२९ वर पोहचलाय. मृत्यूच्या आकड्यात तब्बल ७३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय. बिहारमधील या सुधारीत आकड्यांमुळे देशातील करोना मृत्यूच्या संख्येतही आज मोठी वाढ दिसून आलीय.
करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली... बिहार आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार १७९ जणांना करोनानं गाठलंय. उल्लेखनीय म्हणजे, मंगळवारी करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ७ लाख ०१ हजार २३४ असल्याचं सांगण्यात आलं होतं. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत आकड्यानुसार, ही संख्या कमी कमी ६ लाख ९८ हजार ३९७ असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
कारवाई होणार?
उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर १८ मे रोजी राज्य सरकारनं करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या चौकशीसाठी जिल्ह्यांत दोन पद्धतीच्या टीम तयार केल्या होत्या. दोन्ही स्तरांतील चौकशीत मृत्यूचे खरे आकडे लपवण्यात आल्याचं समोर आलंय. राज्य सरकारला चुकीचे आकडे पाठवणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.
मृत्यूच्या संख्येत लपवाछपवी कशासाठी?
राज्यात करोना मृत्यूंची संख्येची लपवाछपवी होत असल्याची शंका स्थानिक मीडियातून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत होती. रुग्णालयातील मृत्यूचे आकडे आणि स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या आकड्यांत कमालीची तफावत आढळून आली होती.
इतर राज्यांप्रमाणे बिहार सरकारकडूनही करोना मृत्यूंचा आकडा दररोज जाहीर केला जात होता. जिल्ह्यांतून समोर आलेल्या आकड्यांनंतर राज्याचे आकडे जाहीर केले जात होते. परंतु, जिल्ह्यांकडून पाठवण्यात आलेल्या मृतांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचं समोर येतंय.
करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली...
कारवाई होणार?
उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर १८ मे रोजी राज्य सरकारनं करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या चौकशीसाठी जिल्ह्यांत दोन पद्धतीच्या टीम तयार केल्या होत्या. दोन्ही स्तरांतील चौकशीत मृत्यूचे खरे आकडे लपवण्यात आल्याचं समोर आलंय. राज्य सरकारला चुकीचे आकडे पाठवणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.
मृत्यूच्या संख्येत लपवाछपवी कशासाठी?
राज्यात करोना मृत्यूंची संख्येची लपवाछपवी होत असल्याची शंका स्थानिक मीडियातून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत होती. रुग्णालयातील मृत्यूचे आकडे आणि स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या आकड्यांत कमालीची तफावत आढळून आली होती.
इतर राज्यांप्रमाणे बिहार सरकारकडूनही करोना मृत्यूंचा आकडा दररोज जाहीर केला जात होता. जिल्ह्यांतून समोर आलेल्या आकड्यांनंतर राज्याचे आकडे जाहीर केले जात होते. परंतु, जिल्ह्यांकडून पाठवण्यात आलेल्या मृतांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचं समोर येतंय.