नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राजधानीला जाण्याचा तुमचा बेत असेल तर थांबा... अगोदर तुमची करोना चाचणी करून त्याला 'निगेटिव्ह' अहवाल घ्या आणि मगच दिल्लीकडे निघा... केवळ महाराष्ट्रच नाही तर केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाबहून दिल्लीला दाखल होणाऱ्या लोकांना 'निगेटिव्ह आरटी-पीसीआर' रिपोर्ट दाखवल्यानंतरच दिल्लीत प्रवेश मिळणार आहे. करोना संक्रमणा दरम्यान पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता दिल्ली सरकारनं हा निर्णय घेतलाय. आता पाच राज्यांतून दिल्लीला येणाऱ्या नागरिकांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन येणं अनिवार्य असणार आहे.
गेल्या आठवड्यांत आढळलेल्या एकूण करोना रुग्णांपैंकी ८६ टक्के रुग्ण याच पाच राज्यांतील आहेत. त्यामुळे, या पाच राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना आपल्या स्थानाहून दिल्लीला निघालेल्या नागरिकांना ७२ तासांपर्यंतची निगेटिव्ह आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
दिल्ली सरकारचा हा आदेश २६ फेब्रुवाीर शुक्रवारी रात्रीपासून ते १५ मार्च दुपारी १२.०० वाजेपर्यंत लागू राहील. म्हणजेच, महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश किंवा पंजाब या राज्यांतून तुम्ही राजधानी दिल्लीत दाखल होत असाल तर तुमच्याकडे निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट असणं आवश्यक आहे.
हा आदेश विमान, रेल्वे आणि बसमधून प्रवास करत दिल्लीत दाखल होणाऱ्या प्रवाशांना लागू राहील. मात्र, खासगी गाडीने दिल्लीला दाखल होणाऱ्या नागरिकांना मात्र यातून सूट मिळेल.
उत्तराखंडमध्येही निर्बंध लागू
यापूर्वी, उत्तराखंड सरकारनंही असाच निर्णय जाहीर करत या पाच राज्यांतून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी अनिवार्य केली आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांतून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्याच्या सीमेवर करोना चाचणी करावी लागेल. यासाठी आशारोडी चेकपोस्ट, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर चाचणी सुविधा पुरवण्यात येत आहे.
काही राज्यांतील परिस्थिती चिंताजनक
महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा चिंताजनक स्थितीत असल्याचं नुकतंच आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं. केरळमध्ये ३८ टक्के अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात ३७ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या आठवड्यातील संख्येवर नजर टाकली तर महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत ८१ टक्के वाढ झाल्याचं दिसून येतंय. मध्य प्रदेशात ४३ टक्के, पंजाबमध्ये ३१ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये २२ टक्के, छत्तीसगडमध्ये १३ टक्के आणि हरयाणात ११ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय चंदीगडमध्येही करोना रुग्णांच्या संख्येत ४३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.
गेल्या आठवड्यांत आढळलेल्या एकूण करोना रुग्णांपैंकी ८६ टक्के रुग्ण याच पाच राज्यांतील आहेत. त्यामुळे, या पाच राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना आपल्या स्थानाहून दिल्लीला निघालेल्या नागरिकांना ७२ तासांपर्यंतची निगेटिव्ह आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
दिल्ली सरकारचा हा आदेश २६ फेब्रुवाीर शुक्रवारी रात्रीपासून ते १५ मार्च दुपारी १२.०० वाजेपर्यंत लागू राहील. म्हणजेच, महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश किंवा पंजाब या राज्यांतून तुम्ही राजधानी दिल्लीत दाखल होत असाल तर तुमच्याकडे निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट असणं आवश्यक आहे.
हा आदेश विमान, रेल्वे आणि बसमधून प्रवास करत दिल्लीत दाखल होणाऱ्या प्रवाशांना लागू राहील. मात्र, खासगी गाडीने दिल्लीला दाखल होणाऱ्या नागरिकांना मात्र यातून सूट मिळेल.
उत्तराखंडमध्येही निर्बंध लागू
यापूर्वी, उत्तराखंड सरकारनंही असाच निर्णय जाहीर करत या पाच राज्यांतून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी अनिवार्य केली आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांतून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्याच्या सीमेवर करोना चाचणी करावी लागेल. यासाठी आशारोडी चेकपोस्ट, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर चाचणी सुविधा पुरवण्यात येत आहे.
काही राज्यांतील परिस्थिती चिंताजनक
महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा चिंताजनक स्थितीत असल्याचं नुकतंच आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं. केरळमध्ये ३८ टक्के अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात ३७ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या आठवड्यातील संख्येवर नजर टाकली तर महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत ८१ टक्के वाढ झाल्याचं दिसून येतंय. मध्य प्रदेशात ४३ टक्के, पंजाबमध्ये ३१ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये २२ टक्के, छत्तीसगडमध्ये १३ टक्के आणि हरयाणात ११ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय चंदीगडमध्येही करोना रुग्णांच्या संख्येत ४३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.