नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या भीतीनं भारतात जवळपास प्रत्येक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलंय. अधिकांश राज्यात संपूर्णत: तर काही राज्यांत अंशत: लॉकडाऊनची घोषणा स्थानिक सरकारनं केली आहे. दरम्यान, 'लॉकडाऊन'च्या स्थितीत बेधडकपणे रस्त्यावर फिरणारे नागरिक पाहून धडकी भरलेल्या महाराष्ट्र, पंजाब, चंदीगड आणि पुदुच्चेरी सरकारनं ३१ मार्चपर्यंत राज्यात कर्फ्यू घोषित केला आहे. देशभरातील ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील तब्बल ५७७ जिल्ह्यांत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. महाराष्ट्रात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे तसंच संचारबंदी दरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. परंतु, नागरिकांना 'लॉकडाऊन' आणि 'कर्फ्यू' यातला नेमका फरक समजून घेणं कठीण जातंय. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागत असल्याचं चित्र आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संपूर्ण देशात गेल्या रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्यात आला. याला देशभरात उदंड प्रतिसादही मिळाला. पण त्याच रात्री अनेक जण नियम तोडून कोणत्याही कामाशिवाय रस्त्यावर फिरताना आढळले. त्यानंतर काही राज्यांत कर्फ्यू घोषित करण्यात आला. नियम तोडणाऱ्यांवर यामुळे पोलीस कठोर कारवाई करत आहेत.
करोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील
'लॉकडाऊन' म्हणजे काय?
- आपात्कालीन परिस्थितीत सरकारकडून लॉकडाऊन घोषित केला जातो. यामध्ये अत्यावश्यक सेवा बंद केल्या जात नाही. सध्या, लॉकडाऊन लागू असलेल्या राज्यांत बँक, दूध डेअरी, औषध, रेशनिंग, फळ-भाज्या यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू असलेली दिसतात.
- तुम्ही जिथे असाल तिथंच थांबावं हा लॉकडाऊनचा हेतू असतो. यामध्ये नागरिकांना एखाद्या इमारतीत, भागात, राज्य किंवा देशापर्यंत सीमित केलं जातं. बऱ्याचदा नागरिकांना या नियमांत सूटही दिली जाते.
- लॉकडाऊनमध्ये मुख्यत्वे: नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडणारी कारणं बंद केली जातील यावर भर दिला जातो. खासगी कंपन्यांना लॉकडाऊन पाळावा लागल्यानं कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' किंवा सुट्टी जाहीर करावी लागली.
- लॉकडाऊनमध्ये लोकांना घरातच राहण्याची आणि रस्त्यावर न फिरण्याचं आवाहन केलं जातं. केवळ आवश्यक गोष्टींसाठी त्यांनी घराबाहेर पडणं अपेक्षित असतं.
- लॉकडाऊन दरम्यान कोणत्या प्रकारच्या सेवांना सूट दिली जावी? हे तिथलं स्थानिक प्रशासन ठरवतं
- सध्या, करोनाचं संक्रमण फैलावू नये यासाठी लोकांनी घरातच ठेवण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय.
२६३ भारतीयांना इटलीहून आणणाऱ्या कॅप्टन स्वाती यांचे होतेय कौतुक
'कर्फ्यू' (संचारबंदी / जमावबंदी) म्हणजे काय?
- अत्यंत गंभीर परिस्थितीत 'कर्फ्यू'ची अंमलबजावणी केली जाते. ही स्थिती नागरिकांसाठी थोडी अडचणीची ठरू शकते. कारण नागरिकांना कर्फ्यूच्या नियमांचं पालन करावंच लागतं. हा प्रशासनाचा 'आदेश' असतो.
- या दरम्यान नागरिक आपल्या भागात किंवा रस्त्यांवर गर्दी करून उभे राहू शकत नाहीत
- मुख्य म्हणजे, कर्फ्यूच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून पोलीस त्यांना अटक करू शकतात. तसंच अशा नागरिकांना दंडही भरावा लागू शकतो
- कर्फ्यू दरम्यान नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसते
- कर्फ्यू दरम्यान शाळा, महाविद्यालय, बाजार बंद ठेवले जातात
- कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सुविधा सुरू राहील, याची काळजी प्रशासन घेतं
- कर्फ्यू दरम्यान बाजार आणि बँकेसारख्या सेवाही बंद केल्या जातात
- स्थानिक प्रशासनाकडून कर्फ्यू शिथील करण्यात आल्यानंतरच नागरिकांना घरातून बाहेर पडण्याची परवनानगी असते
परदेशातून परतलेत ४० लाख लोक: आरोग्यमंत्री
दरम्यान, देशभरात आत्तापर्यंत ५२५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. तसंच १० जणांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे.
coronavirus: 'करोना'चे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष धोके
coronavirus: स्वत:ला 'क्वारंटाईन' करताना अशी घ्या काळजी
coronavirus Dos and Don'ts: काय करावे, काय करू नये?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संपूर्ण देशात गेल्या रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्यात आला. याला देशभरात उदंड प्रतिसादही मिळाला. पण त्याच रात्री अनेक जण नियम तोडून कोणत्याही कामाशिवाय रस्त्यावर फिरताना आढळले. त्यानंतर काही राज्यांत कर्फ्यू घोषित करण्यात आला. नियम तोडणाऱ्यांवर यामुळे पोलीस कठोर कारवाई करत आहेत.
करोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील
'लॉकडाऊन' म्हणजे काय?
- आपात्कालीन परिस्थितीत सरकारकडून लॉकडाऊन घोषित केला जातो. यामध्ये अत्यावश्यक सेवा बंद केल्या जात नाही. सध्या, लॉकडाऊन लागू असलेल्या राज्यांत बँक, दूध डेअरी, औषध, रेशनिंग, फळ-भाज्या यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू असलेली दिसतात.
- तुम्ही जिथे असाल तिथंच थांबावं हा लॉकडाऊनचा हेतू असतो. यामध्ये नागरिकांना एखाद्या इमारतीत, भागात, राज्य किंवा देशापर्यंत सीमित केलं जातं. बऱ्याचदा नागरिकांना या नियमांत सूटही दिली जाते.
- लॉकडाऊनमध्ये मुख्यत्वे: नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडणारी कारणं बंद केली जातील यावर भर दिला जातो. खासगी कंपन्यांना लॉकडाऊन पाळावा लागल्यानं कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' किंवा सुट्टी जाहीर करावी लागली.
- लॉकडाऊनमध्ये लोकांना घरातच राहण्याची आणि रस्त्यावर न फिरण्याचं आवाहन केलं जातं. केवळ आवश्यक गोष्टींसाठी त्यांनी घराबाहेर पडणं अपेक्षित असतं.
- लॉकडाऊन दरम्यान कोणत्या प्रकारच्या सेवांना सूट दिली जावी? हे तिथलं स्थानिक प्रशासन ठरवतं
- सध्या, करोनाचं संक्रमण फैलावू नये यासाठी लोकांनी घरातच ठेवण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय.
२६३ भारतीयांना इटलीहून आणणाऱ्या कॅप्टन स्वाती यांचे होतेय कौतुक
'कर्फ्यू' (संचारबंदी / जमावबंदी) म्हणजे काय?
- अत्यंत गंभीर परिस्थितीत 'कर्फ्यू'ची अंमलबजावणी केली जाते. ही स्थिती नागरिकांसाठी थोडी अडचणीची ठरू शकते. कारण नागरिकांना कर्फ्यूच्या नियमांचं पालन करावंच लागतं. हा प्रशासनाचा 'आदेश' असतो.
- या दरम्यान नागरिक आपल्या भागात किंवा रस्त्यांवर गर्दी करून उभे राहू शकत नाहीत
- मुख्य म्हणजे, कर्फ्यूच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून पोलीस त्यांना अटक करू शकतात. तसंच अशा नागरिकांना दंडही भरावा लागू शकतो
- कर्फ्यू दरम्यान नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसते
- कर्फ्यू दरम्यान शाळा, महाविद्यालय, बाजार बंद ठेवले जातात
- कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सुविधा सुरू राहील, याची काळजी प्रशासन घेतं
- कर्फ्यू दरम्यान बाजार आणि बँकेसारख्या सेवाही बंद केल्या जातात
- स्थानिक प्रशासनाकडून कर्फ्यू शिथील करण्यात आल्यानंतरच नागरिकांना घरातून बाहेर पडण्याची परवनानगी असते
परदेशातून परतलेत ४० लाख लोक: आरोग्यमंत्री
दरम्यान, देशभरात आत्तापर्यंत ५२५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. तसंच १० जणांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे.
coronavirus: 'करोना'चे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष धोके
coronavirus: स्वत:ला 'क्वारंटाईन' करताना अशी घ्या काळजी
coronavirus Dos and Don'ts: काय करावे, काय करू नये?