पाटणा : करोनाच्या भीतीमुळे सध्या शहरातून गावाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. करोना व्हायरस शहरातून येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून गावातही येऊ नये म्हणून अनेक गावांनी तर बाहेरुन येणारांना तर बंदीच केली आहे. पण बिहारच्या सितामढीमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. मुंबईहून दोन जण गावात आल्याची माहिती पोलिसांना एका ग्रामस्थाने कळवली. यानंतर काही ग्रामस्थांनी मिळून या ३६ वर्षीय व्यक्तीला मरेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
फेक न्यूज रोखा अन्यथा करोनाच्या भीतीनेच अधिक बळी जातीलः सुप्रीम कोर्ट
पोलिसांना माहिती देणाऱ्या व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत एफआयआर दाखल केला आहे. दोन जण मुंबईहून गावात आल्याची माहिती दिल्याचा राग मनात धरुन मारहाण करण्यात आल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. या आरोपांच्या आधारावर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
मरकज तबलीगी जमात : करोनाचा सामुदायिक प्रसार?
दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबईहून परत आलेल्या व्यक्तीबद्दलची माहिती आम्हाला मृताकडून नव्हे, तर स्थानिक पत्रकाराकडून मिळाली असं पोलिसांनी म्हटलं आहे. आता मृताचा मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आला आहे. त्याने पोलिसांना फोन केला होता का याबाबतची माहिती घेतली जात आहे.
दोन जण मुंबईहून २० मार्च रोजी बिहारमधील त्यांच्या मूळ गावी परतले होते. गावात आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणीही झाली. या दोघांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
फेक न्यूज रोखा अन्यथा करोनाच्या भीतीनेच अधिक बळी जातीलः सुप्रीम कोर्ट
पोलिसांना माहिती देणाऱ्या व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत एफआयआर दाखल केला आहे. दोन जण मुंबईहून गावात आल्याची माहिती दिल्याचा राग मनात धरुन मारहाण करण्यात आल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. या आरोपांच्या आधारावर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
मरकज तबलीगी जमात : करोनाचा सामुदायिक प्रसार?
दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबईहून परत आलेल्या व्यक्तीबद्दलची माहिती आम्हाला मृताकडून नव्हे, तर स्थानिक पत्रकाराकडून मिळाली असं पोलिसांनी म्हटलं आहे. आता मृताचा मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आला आहे. त्याने पोलिसांना फोन केला होता का याबाबतची माहिती घेतली जात आहे.
दोन जण मुंबईहून २० मार्च रोजी बिहारमधील त्यांच्या मूळ गावी परतले होते. गावात आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणीही झाली. या दोघांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली.