अ‍ॅपशहर

चिंता वाढली; तबलीघींनी ५ एक्स्प्रेसने केला प्रवास

दिल्लीतील निझामुद्दीन येथील तबलीघी जमातीच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या हजारो लोकांनी देशभरात जाणाऱ्या विविध लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास केला आहे. आता रेल्वेने किती तबलीधींनी रेल्वेने प्रवास केला याची शोध मोहीम हाती घेतली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2020, 9:32 pm
नवी दिल्ली: दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीघी जमातीच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर करोनाशी लढणाऱ्या देशापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. याचे कारण म्हणजे निझामुद्दीनच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या हजारो लोकांनी ५ लांब पल्ल्यांच्या ट्रेनने प्रवास केला आहे. याचे गांभीर्य आणि धोका लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने या पाच एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. करोनाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने रेल्वेने उचललेले पाऊल अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tablighi


तबलीघी जमात मरकझमधील लोकांनी प्रवास केलेल्या या ५ गाड्या १३ मार्च ते १९ मार्च या कालावधीत रवाना झाल्या आहेत. या गाड्यांमध्ये आंध्र प्रदेशात जाणारी दुरंतो एक्स्प्रेस, चेन्नईपर्यंत जाणारी ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस आणि तामिळनाडू एक्स्प्रेस, नवी दिल्ली-रांची राजधानी एक्स्प्रेस आणि एपी संपर्क क्रांती एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

जमातीच्या किती लोकांनी ट्रेनमधून प्रवास केला याचा नेमका आकडा रेल्वेकडे नाही. या मुळे रेल्वेसाठीही हा मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रेनमध्ये सुमारे १००० ते १२०० प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी असतात. या सर्वांना धोका असू शकतो. रेल्वे जिल्हाधिकाऱ्यांना प्रवाशांची यादी उपलब्ध करून देत असून या यादीतील नावाची पडताळणी करण्यात येत आहे. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा शोध घेतला जाणार आहे.

करोनाच्या लढाईतील शहीदांच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत-केजरीवाल

गृह मंत्रालयानेही देशभरात तबलीघी जमातीसी संबंधित माहिती प्रसिद्ध केली आहे. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, तबलीघी जमातीने आपले कार्यक्रम देशभर सुरूच होते. या कार्यक्रमाअंतर्गत जमातीच्या देश-विदेशातील प्रचारकांनी देशातील विविध भागांचा दौरा केला. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्चपर्यंत तब्बल ८२४ परदेशी मुस्लिमांनी देशातील विविध भागांमध्ये इस्लाम धर्माचा प्रचार केला. तर, २१६ परदेशी निझामुद्दीनच्या मरकझमध्ये होते. हे परदेशी मुस्लिम इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आण किर्गीस्तान येथून येऊन तबलीघच्या धर्म प्रचाराचे काम करत होते.

तबलीघींच्या ६ मजली इमारतीत नेमके काय होते?

दिल्ली: शासकीय डॉक्टरला करोनाची लागण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज