भोपाळ : वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान मध्य प्रदेशात एकीकडे रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत असताना मंत्र्यांची वायफळ आणि बेजबाबदार बडबड सुरू असल्याचं दिसतंय. 'वय झालं की मृत्यू अटळ आहे... करोनामुळे होणारे मृत्यू कुणीही रोखू शकत नाही', असं असंवेदनशील वक्तव्य शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारातील मंत्र्यानं केलंय. राज्यात करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असताना राज्याचे पशुपालन मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.
मध्य प्रदेशच्या बडवानी मतदारसंघाचे आमदार प्रेम सिंह पटेल सेंधवाचा दौरा करून भोपाळमध्ये परतले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढण्याबद्दल प्रश्न विचारले. यावर, 'करोनामुळे मृत्यू तर झालेत, ते कुणीही रोखू शकत नाही' असं मंत्रीमहोदयांनी म्हटलं.
करोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचा आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि तज्ज्ञांचा सल्लाही आवश्यक आहे, असे सल्लेही त्यांनी नागरिकांना दिलेत.
राज्यातील आरोग्य सुविधेची स्थिती
मंत्र्यांकडून अशी वक्तव्य समोर येत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी भयंकर चित्रं आणि आरोग्य सुविधांबाबत उदासिनता दिसून येतेय. राज्यात अनेक ठिकाणी करोना रुग्णांना बेड, ऑक्सिजन सिलिंडर, औषधं मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागाही कमी पडत आहे. आपल्या आप्तेष्टांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी समोर आलं होतं.
काँग्रेसकडून पटेलांच्या निलंबनाची मागणी
काँग्रेसकडून मात्र पटेल यांच्या या वक्तव्यावर टीका करण्यात आलीय. भाजपची मानसिकता काय आहे? हेच त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. प्रेम सिंहह मंत्रीपदाच्या योग्यतेचे नाहीत. भाजप सरकारनं अशा मंत्र्यावर ताबडतोब कारवाई करत त्यांना निलंबित करायला हवं, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दुर्गेश शर्मा यांनी केलीय.
काय सांगते आकडेवारी
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात आतापर्यंत ३ लाख ६३ हजार ३५२ जणांना करोनानं गाठलंय. यातील ४९ हजार ५५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ४ हजार ३१२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
मध्य प्रदेशच्या बडवानी मतदारसंघाचे आमदार प्रेम सिंह पटेल सेंधवाचा दौरा करून भोपाळमध्ये परतले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढण्याबद्दल प्रश्न विचारले. यावर, 'करोनामुळे मृत्यू तर झालेत, ते कुणीही रोखू शकत नाही' असं मंत्रीमहोदयांनी म्हटलं.
करोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचा आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि तज्ज्ञांचा सल्लाही आवश्यक आहे, असे सल्लेही त्यांनी नागरिकांना दिलेत.
राज्यातील आरोग्य सुविधेची स्थिती
मंत्र्यांकडून अशी वक्तव्य समोर येत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी भयंकर चित्रं आणि आरोग्य सुविधांबाबत उदासिनता दिसून येतेय. राज्यात अनेक ठिकाणी करोना रुग्णांना बेड, ऑक्सिजन सिलिंडर, औषधं मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागाही कमी पडत आहे. आपल्या आप्तेष्टांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी समोर आलं होतं.
काँग्रेसकडून पटेलांच्या निलंबनाची मागणी
काँग्रेसकडून मात्र पटेल यांच्या या वक्तव्यावर टीका करण्यात आलीय. भाजपची मानसिकता काय आहे? हेच त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. प्रेम सिंहह मंत्रीपदाच्या योग्यतेचे नाहीत. भाजप सरकारनं अशा मंत्र्यावर ताबडतोब कारवाई करत त्यांना निलंबित करायला हवं, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दुर्गेश शर्मा यांनी केलीय.
काय सांगते आकडेवारी
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात आतापर्यंत ३ लाख ६३ हजार ३५२ जणांना करोनानं गाठलंय. यातील ४९ हजार ५५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ४ हजार ३१२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.