नवी दिल्लीः करोनाची दुसरी लाटेने देशातील स्थिती बिकट ( covid 19 india ) बनली आहे. आधी जागतील इतर देशांना मदत करणाऱ्या भारताला अनेक देशांमधून मदत येत आहे. यासर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील काँग्रेससह १२ पक्षांनी पंतप्रधान मोदींना संयुक्त पत्र लिहिलं आहे. विरोधी पक्षांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने आणि केंद्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे परिस्थिती गंभीर झाल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला आहे. करोनावरील लसींचं उत्पादन वाढवावं. तसंच यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेल्या ३५००० कोटी रुपये खर्च करावेत, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.
सेंट्रल विस्ट प्रोजेक्टचं काम तातडीने थांबवावं. या प्रोजेक्टसाठी तरतूद केलेला निधी ऑक्सिजन आणि लसींवर खर्च केला जावा. पीएम केअर्स फंडाचा निधीही ऑक्सिजन, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी वापरण्यात यावा, अशी मागणी या पत्रातून काँग्रेसस १२ राजकीय पक्षांनी केली आहे.
coronavirus update : 'WHO ने आपल्या रिपोर्टमध्ये करोनाच्या व्हेरियंटला 'भारतीय' म्हटलेले नाही'
करोना व्हायरसच्या संकटामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये मदत दिली जावी. केंद्रीय अन्न महामंडळाच्या गोदामांतील धान्य गरजू नागरिकांना मोफत दिले जावे. तसंच तीन नवीन कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांनाही या करोनाच्या संकटातून वाचवण्याचं आवाहन, विरोधी पक्षांनी पत्रातून केलं आहे.
coronavirus : 'वाळूत डोकं घुसळून सकारात्मकता येत नाही, ही देशाची निव्वळ फसवणूक'
सेंट्रल विस्ट प्रोजेक्टचं काम तातडीने थांबवावं. या प्रोजेक्टसाठी तरतूद केलेला निधी ऑक्सिजन आणि लसींवर खर्च केला जावा. पीएम केअर्स फंडाचा निधीही ऑक्सिजन, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी वापरण्यात यावा, अशी मागणी या पत्रातून काँग्रेसस १२ राजकीय पक्षांनी केली आहे.
coronavirus update : 'WHO ने आपल्या रिपोर्टमध्ये करोनाच्या व्हेरियंटला 'भारतीय' म्हटलेले नाही'
करोना व्हायरसच्या संकटामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये मदत दिली जावी. केंद्रीय अन्न महामंडळाच्या गोदामांतील धान्य गरजू नागरिकांना मोफत दिले जावे. तसंच तीन नवीन कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांनाही या करोनाच्या संकटातून वाचवण्याचं आवाहन, विरोधी पक्षांनी पत्रातून केलं आहे.
coronavirus : 'वाळूत डोकं घुसळून सकारात्मकता येत नाही, ही देशाची निव्वळ फसवणूक'