नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या करोनाविरुद्धच्या युद्धात भारतानं एक ऐतिहासिक टप्पा गाठलाय. भारतात आज (गुरुवारी) लसीकरणाच्या आकड्यानं १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा क्षण 'उल्लेखनीय यश' म्हणून साजरं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय.
लाल किल्ल्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हा क्षण सरकारकडूनही साजरा केला जातोय. लाल किल्ल्यावर सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकावत हा क्षण ऐतिहासिक महत्त्व देण्यात आलंय. या तिरंग्याची लांबी २२५ फूट आणि रुंदी १५० फूट आहे. या राष्ट्रध्वजाचं वजन जवळपास १४०० किलो आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसरा, हाच तिरंगा २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्तानं लेहमध्ये फडकावण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींचा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद
या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल झाले. इथे त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
सोबतच सर्व रेल्वे स्टेशन, बस स्थानके अशा सार्वजनिक ठिकाणीही १०० कोटी लसीचे डोस पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आलीय. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही देशाला लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 'दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाचं हे फळ असल्याचं' आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.
'कोविन' वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत लसीकरणानं एकूण ९९.७ कोटींचा टप्पा गाठला होता. यामध्ये जवळपास ७५ टक्के वयस्क नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे तर जवळपास ३१ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस प्राप्त केले आहेत.
लाल किल्ल्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा
पंतप्रधान मोदींचा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद
या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल झाले. इथे त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
सोबतच सर्व रेल्वे स्टेशन, बस स्थानके अशा सार्वजनिक ठिकाणीही १०० कोटी लसीचे डोस पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आलीय. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही देशाला लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 'दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाचं हे फळ असल्याचं' आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.
'कोविन' वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत लसीकरणानं एकूण ९९.७ कोटींचा टप्पा गाठला होता. यामध्ये जवळपास ७५ टक्के वयस्क नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे तर जवळपास ३१ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस प्राप्त केले आहेत.