अ‍ॅपशहर

रेल्वे स्थानके पुन्हा गजबजली; २०० विशेष ट्रेन सुरू

विविध राज्यांकडून श्रमिकांसाठीच्या ३२१ विशेष गाड्यांची मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे. या गाड्यांबाबत रेल्वे लवकरच निर्णय घेईल. मात्र, या गाड्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. गोंधळ टाळण्यासाठी प्रवाशांच्या यादीसह रेल्वेंची मागणी ३० मेपर्यंत नोंदविण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी राज्य सरकारांना केल्या होत्या. त्यानुसार ३० मे अखेर रेल्वेकडे ३२१ गाड्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 2 Jun 2020, 2:24 am
नवी दिल्ली : रेल्वेने सोमवारपासून २०० प्रवासी गाड्यांच्या संचालनास सुरुवात केली. आपापल्या मूळ गावी परतण्यासाठी दिल्लीसह अनेक शहरांतील रेल्वे स्थानकांबाहेर श्रमिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानके पुन्हा गजबजली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम special trains


बहुतेक ठिकाणी सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन झाल्याचे दिसले. गर्दी टाळण्यासाठी नवी दिल्ली, हजरत निझामुद्दीन आणि दिल्ली जंक्शन या तिन्ही ठिकाणी स्थानकावर येण्याची आणि बाहेर जाण्याची व्यवस्था पोलिसांनी लावली होती.

३२१ रेल्वेंची मागणी

विविध राज्यांकडून श्रमिकांसाठीच्या ३२१ विशेष गाड्यांची मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे. या गाड्यांबाबत रेल्वे लवकरच निर्णय घेईल. मात्र, या गाड्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. गोंधळ टाळण्यासाठी प्रवाशांच्या यादीसह रेल्वेंची मागणी ३० मेपर्यंत नोंदविण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी राज्य सरकारांना केल्या होत्या. त्यानुसार ३० मे अखेर रेल्वेकडे ३२१ गाड्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या बहुतेक गाड्यांचे गंतव्य स्थान पश्चिम बंगाल आहे.

आतापर्यंत रेल्वेने ४००० फेऱ्यांद्वारे सुमारे ५६ लाख श्रमिकांना आपापल्या मूळ गावी पोहोचवले आहे, अश माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली. रोज सरासरी २०० श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत.

'बीआरओ'ला हव्यात विशेष गाड्या

लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड या चीन सीमेवरील राज्यांतील मोठ्या बांधकाम प्रकल्पांसाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननेही (बीआरओ) झारखंडहून श्रमिकांना घेऊन येण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची विनंती रेल्वेला केली आहे. लडाखमध्ये ८२००, जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडातील प्रकल्पांसाठी २५०० मजुरांची आवश्यकता आहे, अशी माहिती 'प्रोजेक्ट विजयक'मधील कमांडर कौशिक मित्रा यांनी दिली. दरवर्षी हे सर्व मजूर स्वत:च एप्रिलमध्ये या भागात पोहोचतात. यंदा मात्र लॉकडाउनमुळे विशेष व्यवस्था करून त्यांना आणावे लागेल, असेही मित्रा म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज