अ‍ॅपशहर

coronavirus india update : करोनाची दुसरी लाट जीवघेणी; २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नवीन रुग्ण, १५०० मृत्यू

देशात करोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी अडीच लाखाहून अधिक नवीन रुग्णांची संख्या नोंदवली गेला आहे. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2021, 11:07 am
नवी दिल्लीः देशात करोना दुसरी लाट आता आणखी धोकादायक बनत ( coronavirus india update ) चालली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये बेड आणि ऑक्सिजन तुटवडा जाणवत ( new covid19 cases ) आहे. दुसरीकडे रुग्णांचा मृत्युही वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालाने देशातील करोना रुग्णांसंबंधीची आज सकाळी ताजी आकडेवारी जारी केली आहे. यात देशात गेल्या २४ तासांत करोनाचे विक्रमी रुग्ण आढळून आले आहेत. देशात २,६१,५०० नवीन रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्राने दिली आहे. गेल्या वर्षी मार्चच्या सुरवातीला करोना संकटाच्या सुरवातीपासून आतापर्यंतही एका दिवसातील रुग्णांचीही सर्वाधिक संख्या आहे. देशात प्रथमच अडीच लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus india
करोनाची दुसरी लाट जीवघेणी; २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नवीन रुग्ण, १५०० मृत्यू


यासोबतच गेल्या २४ तासांत करोनाने १५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी देशभरात १५०१ नागरिकांचा मृत्यू झाला. देशात सलग दुसऱ्या दिवशी करोना मृत्युच्या संख्येने विक्रम केला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत दिवसाला होणाऱ्या सर्वाधिक मृत्युंची संख्या ही १२९० होती. ही संख्या १६ सप्टेंबरला नोंदवली गेली होती. गेल्या दोन महिन्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ पटीने वाढल्याने स्थिती किती गंभीर आहे, हे यावरून लक्षात येतंय.

देशात करोनाने होणाऱ्या एकूण मृत्युंची संख्या ही वाढून १,७७,१५० इतकी झाली आहे. तर देशातील सध्याची अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ती १८ लाखांवर गेली आहे. देशात १८,०१,३१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाने बरे होण्याऱ्या रुग्णांच्या टक्केवारीतही घट झाली आहे. ही टक्केवारी ८६.६ इतकी झाली आहे.

Remdesivir : 'त्या' १६ निर्यातदारांची यादी द्या, नवाब मलिकांच्या आरोपांवर केंद्रीय मंत्र्यांचं प्रत्यूत्तर

करोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे लसीकरण मोहीमही सुरू आहे. देशात करोनाविरोधी लढाईत १२ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत १२ कोटी २६ लाख २२ हजार ५९० नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

Coronavirus : 'करून दाखवलं', करोना मृत्यूवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज