अ‍ॅपशहर

४५ जिल्ह्यांत १४ दिवसांत नवीन रुग्ण नाही

देशातील २३ राज्यांमधील ४७ जिल्ह्यांत गेल्या २८ दिवसांपासून करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर इतर ४५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशातील करोना रुग्णांची संख्या १४३७८ झाली. गेल्या २४ तासांत ९९१ नवे रुग्ण आढळले तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृतांची एकूण संख्या ४८० इतकी झाली आहे. करोनाचे एकूण १९९२ रुग्ण बरे झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2020, 5:26 pm
नवी दिल्लीः करोना रुग्णांची संख्या देशातील काही भागांमध्ये हळूहळू कमी होत असल्याचा सकारात्मक ट्रेंड समोर आला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. देशातील २३ राज्यांमधील ४७ जिल्ह्यांत गेल्या २८ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. तर इतर ४५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. हे असे जिल्हे आहेत जिथे सुरुवातीला करोनाचे रुग्ण आढळून आले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Health-Ministry


एकूण १४३७८ रुग्णांपैकी ४२९१ रुग्ण (२९.८ टक्के) हे निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझशी संबंधित आहेत. २३ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये तबलीघीचे रुग्ण आहेत. यातील ८४ टक्के रुग्ण तामिळनाडूत, दिल्लीत ६३ टक्के, ७९ टक्के तेलंगण, ५९ टक्के उत्तर प्रदेश आणि ६१ टक्के आंध्र प्रदेशात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.

देशातील करोना रुग्णांचा मृत्यू दर ३.३ टक्के इतका आहे. यात वयाच्या विभागणीनुसार वेगगेवळी टक्केवारी समोर आली आहे. ४५ वयापर्यंतच्या रुग्णांचे १४.४ टक्के, ४५ ते ६० वयाच्या रुग्णांचा १०.३ टक्के ६०-७५ वयोगाटातील रुग्णांचा ३३.१ टक्के आणि ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू दर हा ४२.२ टक्के इतका आहे.

देशातील करोना रुग्णांची संख्या १४३७८ झाली. गेल्या २४ तासांत ९९१ नवे रुग्ण आढळले तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृतांची एकूण संख्या ४८० इतकी झाली आहे. करोनाचे एकूण १९९२ रुग्ण बरे झाले आहेत.

अवघ्या काही मिनिटांत 'करोना' शोधून काढणारी पेपर टेस्ट स्ट्रिप!

मजुराची आत्महत्येपूर्वीची कमाई - फोन विकून २५०० र...

विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत वाढवली

करोना व्हायरसमुळे अडकून पडलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदतवाढ विनाशुल्क असून ती लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजे ३ मेपर्यंत वाढवली गेली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. ज्या विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. आणि ज्यांच्या व्हिसाची मुदत लवरच संपणार आहे अशा विदेशी नागरिकांनी व्हिसा मुदतवाढीसाठी अर्ज करावा, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज