अ‍ॅपशहर

एका आठवड्यात देशात ६१ हजार नवे करोना रुग्ण, पुन्हा लॉकडाऊन?

लॉकडाऊनचा मूळ उद्देशच करोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि आरोग्य यंत्रणांना तयार करण्यासाठीचा होता. लॉकडाऊन उघडल्यावर रुग्णसंख्या वाढणार आहे. पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाता कामा नये. जर असं झालं तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येईल, असं दिल्लीतील शालीमार बागमधील फोर्टिस हॉस्पिटलमधील फुफ्फुस विभागाचे संचालक डॉ. विकास मौर्य यांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2020, 2:26 am
नवी दिल्लीः येत्या सोमवार देशात अनलॉकचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. पण करोना व्हायरसचा प्रादुर्भाव मात्र कमी झालेला नाही. गेल्या आठवड्याभरात देशात करोनाचे ६१ हजार नवे रुग्ण आढळून आलेत. यामुळे शुक्रवारी भारत करोना देशांच्या यादीत वर जाऊन सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली तर पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर करोनाविरोधी महामारीवर उपयायजोना करण्यासाठी रणनिती तज्ज्ञांऐवजी नोकरशहा बनवत आहेत, असं म्हणत एम्समधील (AIIMS) वरिष्ठ डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus india


टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उघडण्यात आला तरी करोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार आहे. लॉकडाऊनचा मूळ उद्देशच करोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि आरोग्य यंत्रणांना तयार करण्यासाठीचा होता. लॉकडाऊन उघडल्यावर रुग्णसंख्या वाढणार आहे. पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाता कामा नये. जर असं झालं तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येईल, असं दिल्लीतील शालीमार बागमधील फोर्टिस हॉस्पिटलमधील फुफ्फुस विभागाचे संचालक डॉ. विकास मौर्य यांनी सांगितलं.

नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये. घराबाहेर गेल्यास मास्क घालणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि सतत हात धुवावेत. या चार गोष्टींचं पालन काटेकोरपणे केल्यास रुग्णसंख्या रोखण्यास मदत होईल. देशातील सध्याची स्थिती पुन्हा लॉकडाऊन लावण्याची नाहीए. पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर लॉकडाऊन घोषित होऊ शकतो, असं नामवंत फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितलं.

करोनाविरोधातील लढाईत नोकरशहांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. महामारी संबंधी तज्ज्ञांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा कुठलाही समावेश त्यात करण्यात आलेला नाहीए. दुर्दैवाची गोष्टी म्हणजे सरकार करोनाविरोधी लढाईत संबंधित शास्त्रज्ञांचा सल्ला घेत नाहीए. सरकार फक्त नोकरशहांचाच उपयोग करत आहे, अशी नाराजी एम्समधील डॉक्टर अनुप सराया यांनी इंडियन जरनल ऑफ पब्लिक हेल्थच्या संपादकांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

आयसीएआरच्या शस्त्रज्ञांनी करोनावर शोधले औषध!
राहुल गांधींची सरकारवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली आणि ब्रिटन या देशांमधील करोना रुग्णांचे आकडे शेअर केले. आणि रुग्ण कमी होत आल्यावर या देशांनी लॉकडाऊन किंवा निर्बंध हटवले. पण भारतात लॉकडाऊनमध्येही करोनाचे रुग्ण वाढतच होते. ३१ मे रोजी संपलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापर्यंत आणि त्यानंतर रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज