अ‍ॅपशहर

'सणासुदीच्या काळात सूट दिल्यास करोनाचे महिन्याला २६ लाख नवीन रुग्ण आढळून येतील'

देशात करोनाने संसर्ग आपली सर्वोच्च पातळी गाठून गेला आहे. यामुळे करोना संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे, असं सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने म्हटलं आहे. पण त्याचबरोबर आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सरकारला समितीने इशाराही दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2020, 11:05 pm
नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात करोना संदर्भात सतर्कता न बाळगल्यास आणि सूट दिल्यास महिन्याला २६ लाख नवीन करोना रूग्ण समोर येऊ शकतात, असा इशारा केंद्र सरकारच्या एका तज्ज्ञ समितीने दिला आहे. भारतात करोनाचा संसर्ग सर्वोच्च पातळी गाठून गेला आहे. आता रोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे, यावरून समितीने हा दावा केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम festive season starting
'सणांच्या काळात सूट दिल्यास करोनाचे महिन्याला २६ लाख रुग्ण आढळून येतील'


करोनामुळे देशातील केवळ ३० टक्के नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत येणारा हिवाळा आणि उत्सवांमध्ये कुठल्याही स्तरावरील निष्काळजी चिंता वाढवू शकते. करोना संदर्भात जारी केलेल्या सुरक्षा नियमांचे आणि मागर्दर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले गेले तर फेब्रुवारी २०२१ पर्यंत या देशात करोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल, असं समितीने म्हटलं आहे.

हिवाळ्यातील थंडीची चाहूल आणि आगामी सणांच्या हंगाम पाहता देशात करोना संसर्गाची नवी लाट येण्याचा धोका आहे. अशा स्थितीत कुठल्याही स्तरावर दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा अतिशय बिकट परिस्थिती उद्भवू शकते. करोनासंदर्भात जारी केलेले सुरक्षेचे प्रोटोकॉल आणि इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावेत, अशी शिफारस समितीने सरकारला केली आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत करोना संसर्ग नियंत्रणात आल्यास एकूण रूग्णांची संख्या सुमारे १ कोटी ५ लाखापर्यंत असेल. सध्या ही संख्या ७५ लाखांच्या जवळ आहे, असं समितीने म्हटलं आहे.

'लॉकडाउन नसता तर मृतांची संख्या २५ लाखांवर'

देशात लॉकडाउन घोषित केला नसता तर ऑगस्टपर्यंत २५ लाख नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला असता. सध्या ही संख्या १ लाख १४ हजारांच्या जवळ आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा देशव्यापी लॉकडाउन करावा, याचे समर्थन समितीने केलेले नाही. एखाद्या विशिष्ट भागात संसर्ग वाढल्यास लॉकडाउनचा उपयोग करता येऊ शकतो, असं समितीने सुचवलं आहे.

देशात करोना समूह संसर्गाच्या टप्प्यात, अखेर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची कबुली

कमलनाथांची जीभ घसरली, भाजप उमेदवाराला 'आयटम' म्हटले

केरळमधील ओणमदरम्यान वाढला संसर्ग

दरम्यान, सणांच्या काळात नागरिकांची गर्दी होते. केरळमध्ये २२ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान ओणम सणानंतर संसर्गात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं होतं. संसर्ग होण्याची शक्यता ३२ टक्क्यांनी वाढली आहे. तर, प्रभावी उपचार मिळण्याची शक्यता २२ टक्क्यांनी कमी झाली आहे. आता येत्या दोन महिन्यांत दसरा आणि दीपावलीसारखे सण येत आहेत. यामुळे कुठल्याची प्रकारची अधिक सूट देणं धोकादायक ठरू शकतं, असं समितीने म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज