अ‍ॅपशहर

४४ लाख मजुरांना श्रमिक ट्रेनने सोडलं, रेल्वे विभागाची माहिती

नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आणि गृहमंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी रेल्वेकडून करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशन आणि प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वेचे उत्तर विभागाचे माहिती जनसंपर्क अधिकारी आर. के. राणा यांनी दिली. एखादा प्रवासी प्रवासादरम्यान नियमांचे पालन करत नसेल तर त्याचे तिकीट रद्द करण्यात येत आहे, असं राणा यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2020, 6:51 pm
नवी दिल्लीः लॉकडाऊनमुळे देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी रेल्वेकडून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात येत आहेत. रेल्वेकडून २५ मे पर्यंत ३२४७ श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात आल्या. याद्वारे ४४ लाख स्थलांतरीत मजुरांना आपल्या राज्यात सोडण्यात आलं, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आलीय. २५ मे रोजी २२३ श्रमिक विशेष ट्रेनद्वारे २.८ नागरिकांना सोडण्यात आल्याचं रेल्वेनं म्हटलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shramik special train (File Photo)


नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आणि गृहमंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी रेल्वेकडून करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशन आणि प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वेचे उत्तर विभागाचे माहिती जनसंपर्क अधिकारी आर. के. राणा यांनी दिली. एखादा प्रवासी प्रवासादरम्यान नियमांचे पालन करत नसेल तर त्याचे तिकीट रद्द करण्यात येत आहे, असं राणा यांनी स्पष्ट केलं.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी रेल्वेने १ मेपासून श्रमिक विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. या ट्रेनद्वारे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. श्रमिक विशेष ट्रेनसह १२ मेपासून रेल्वेकडून ३० राजधानी विशेष एसी ट्रेन चालवल्या जात आहेत. यासोबतच १ जूनपासून रेल्वेकडून २०० विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन बुकींग आणि रेल्वे स्टेनशवरही आरक्षण करता येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्येही बुकींगची सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने प्रवाशांना वेळेत आणावं, रेल्वेची विनंती

महाराष्ट्रातील अनेक स्टेशनवर रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पण राज्य सरकारकडून प्रवाशांना आणण्यात विलंब होत आहे. रेल्वे गाड्या वेळेवर सोडण्यासाठी राज्य सरकारने प्रवाशांना वेळेत रेल्वे स्टेशनवर आणावं, अशी विनंती रेल्वेने महाराष्ट्र सरकारला केली आहे.

सीएसएमटी स्टेशनवर आज साडेबारा वाजता प्रवाशांना रेल्वे बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे पाहता राज्य सरकारने सर्व स्टेशनवर प्रवाशांना वेळेत आणावं. यामुळे सर्व गाड्या नियोजित वेळनुसार सोडता येतील. राज्य सरकारशी समन्वय साधून आज महाराष्ट्रातून एकूण १४५ विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेची माहिती जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. प्रवाशांना स्टेशनवर आणण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून राज्यांनी रेल्वे गाड्या वेळेत सोडण्यासाठी अधिकाधिक सहकार्य करावं, असं सुतार म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज