अ‍ॅपशहर

... अन्यथा देशात आर्थिक अराजकता माजेल, राहुल गांधींचा इशारा

लॉकडाऊनचे दोन उद्देश होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि करोनाविरोधी लढाईसाठी तयारी करणं. पण देशात करोनाचे रुग्ण वाढतच आहेत आणि लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेत. यामुळे अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे सरकारच्या हाती यश आलेलं नाहीए हे स्पष्ट होतंय, असं राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2020, 12:34 am
नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला पुन्हा सतर्कतेचा इशारा दिला आहे. गरीब, मजूर, शेतकरी आणि सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांना सरकारने तातडीने मदत दिली नाही तर देशात आर्थिक अराजकता माजेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिलाय. राज्यांना केंद्र सरकारने मदत दिली पाहिजे, असंही ते विरोधी पक्षांच्या बैठकीत म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rahul Gandhi


लॉकडाऊनचे दोन उद्देश होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि करोनाविरोधी लढाईसाठी तयारी करणं. पण देशात करोनाचे रुग्ण वाढतच आहेत आणि लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेत. यामुळे अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे सरकारच्या हाती यश आलेलं नाहीए हे स्पष्ट होतंय, असं राहुल गांधी म्हणाले.

लॉकडाऊनमुळे कोट्यवधी नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता त्यांना मदत दिली गेली नाही, त्यांच्या खात्यात ७५०० रुपये जमा केले नाही, त्यांना रेशन दिले गेले नाही, स्थलांतरीत मजुरांना आणि शेतकऱ्यांना सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांना मदत दिली गेली नाही तर आर्थिक अराजकता माजेल, असं राहुल गांधी म्हणाले.

सरकारच्या लाखो कोटींच्या पॅकेजचा आताच्या घडीला थेट उपयोग होणार नाहीए. नागरिकांना कर्जाची नाही तर थेट मदतीची गरज आहे. आता सरकारविरोधात आवाज उठवणं ही आपली जबाबदारी आहे. हा देशाचा प्रश्न आहे, राजकीय पक्षांचा नाही. असं झालं नाही तर कोट्यवधी नागरिक गरीबीत ढकलले जातील, असं राहुल गांधी म्हणाले.

राजधानी विशेष ट्रेनसाठी आता ३० दिवसांपूर्वी करा अॅडव्हान्स बुकींग

स्वावलंबी भारत पॅकेज म्हणजे क्रूर थट्टा : सोनिया गांधी

राज्ये आणि जिल्ह्यांमधून करोनाविरोधात लढाई लढली जातेय. केंद्र सरकार नेतृत्व करू शकते. पण राज्यांना जी मदत अपेक्षित आहे ती झालेली नाही. हे राजकारण नाहीए. देशाच्या हितासाठी सत्य मान्य करून राज्यांना ताकद आणि आर्थिक मदत देण्याची गरज आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज