अ‍ॅपशहर

दुकानावर एकावेळी ५ पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही

केंद्रीय गृहमंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. दुकानं, कंपन्यांची कार्यालयं आणि लग्न समारंभांमध्ये कशा प्रकारे सोशल डिस्टन्सिंग केले जावे, याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कंपनीच्या किंवा संस्थेच्या प्रमुखाची असेल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 May 2020, 6:34 pm
नवी दिल्लीः आतापर्यंत ६२ विशेष ट्रेन स्थलांतरीत मजुरांसाठी चालवण्यात आल्या आहेत. देशातील विविध भागातून या विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. या विशेष ट्रेनद्वारे आतापर्यंत ७० हजार प्रवाशांना सोडण्यात आले आहे. आज जवळपास १३ ट्रेन चालवण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलीय. यासोबतच केंद्रीय गृहमंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम home-ministry


लॉकडाऊनशी संबंधित केंद्र सरकारचे दिशानिर्देश

- सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी मास्क लावणं बंधनकारक आहे.

- सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींदरम्यान १ मीटर इतक्या अंतराचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे.

- सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडासह कठोर कारवाई केली जाईल.

- सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, मद्यपान, गुटखा आणि तंबाखू खाण्यावर बंदी आहे.

- दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं आवश्यक आहे. दुकानावर एकच वेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत. ग्राहकांना रांगेत उभं करावं.

- कुठल्याही संघटनेला किंवा संस्थेला पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र आणण्यास मनाई आहे.

- लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक नागरिकांच्या एकत्र येण्यावर मनाई आहे. लग्न समारंभातही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे.

- अंत्यसंस्कारावेळीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. अंत्यविधीला २० पेक्षा अधिक नागरिक सहभागी होऊ शकत नाही.

- खासगी ऑफिसेस किंवा संस्थांच्या कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग, मास्क, हॅण्डवॉश आणि सॅनिटायजर आवश्यक आहे.

- कार्यालयांमध्ये आणि कंपन्यांच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करणं आवश्यक आहे.

- कामाच्या ठिकाणी दोन शिफ्ट दरम्यान काही वेळाचं अंतर ठेवावं. कर्मचाऱ्यांना एकचवेळी दुपारच्या जेवणाची सुट्टी न देता वेगवगेळ्या वेळेत सोडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे.

- कामाच्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी करणं बंधनकारक असेल. याची जबाबदारी कंपनी किंवा संस्थेच्या प्रमुखांवर असेल.

करोनाचे देशात २४ तासांत सर्वाधिक नवीन रुग्ण आणि मृत्युही

- ऑफिसेस किंवा कामाची ठिकाणं वेळोवेळी सॅनिटाइज केली गेली पाहिजे.

- करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जवळच्या हॉस्पिटल्सची यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जावी.

- संस्थांनी आणि कंपन्यांनी कामाच्या ठिकाणी क्वारंटाइनसाठीही जागा उपलब्ध करून द्यावी. गर्दी होईल अशा मोठ्या बैठका घेणं टाळलं पाहिजे.

- कामाच्या ठिकाणी सफाई आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज