भोपाळ : करोना पॉझिटीव्ह असल्याच्या संशयावरुन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका विद्यार्थ्याने पळ काढला. मध्य प्रदेशातील छतरपूरमधील नौगाव भागातील ही घटना आहे. चीनहून आलेला हा विद्यार्थी करोनाबाधित असल्याचा संशय असल्यामुळे त्याला रुग्णालयातील स्वतंत्र वॉर्डात भरती करण्यात आलं होतं. त्याच्या रक्ताचे नमुनेही पुण्याला पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी कसून तपास घेतल्यानंतर या तरुणाचा शोध लागला आणि त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
केरळमध्ये 'करोना'चा तिसरा रुग्ण आढळला
नौगावमधील रहिवासी अभिषेक सिंह राजपूत चीनमध्ये राहून एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. अभिषेक २० दिवसांपूर्वीच घरी परतला होता. परत आल्यापासूनच त्याला सर्दी-ताप होता. तो तपासणीसाठी रुग्णालयात गेला तेव्हा त्याला स्वाईन फ्लूसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डात भरती करण्यात आलं. रविवारी दुपारी तो अचानक रुग्णालयातून फरार झाला.
रुग्णाने पळ काढल्याचं लक्षात येताच रुग्णालय प्रशासनामध्ये खळबळ माजली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि रविवारी रात्री ९ वाजता अभिषेकला पुन्हा त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. अभिषेकला पुन्हा एकदा रुग्णालयात नेण्यात आलं. तो १४ जानेवारीलाच भारतात परतला आहे.
चीनमधून आणखी ३२३ भारतीयांना परत आणलं
भारतीयांची चीनमधून सुटका
एअर इंडियाच्या विशेष विमानाने रविवारी चीनच्या वुहान शहरातून ३२३ भारतीय आणि मालदीवच्या सात नागरिकांना रविवारी भारतामध्ये आणण्यात आलं. चीनमधील भारतीयांना घेऊन येणारे हे एअर इंडियाची दुसरे विमान आहे. चीनमधून आणण्यात आलेल्या या भारतीयांपैकी कोणालाही संसर्ग झालेला नसल्याचे चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून '३२३ भारतीय आणि मालदिवच्या नागरिकांची सुटका करण्यात आली. या मोहिमेमध्येही शेजारी देशांची अग्रक्रमाने मदत हे ध्येय ठेवण्यात आले,' असे म्हटले आहे.
करोनाः चीनमध्ये जाणे टाळा, केंद्र सरकारची सूचना
ई-व्हिसा सेवा स्थगित
करोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्यानंतर, भारताने चिनी प्रवासी आणि चीनमध्ये राहणाऱ्या अन्य देशांच्या नागरिकांसाठी असणारी ई-व्हिसा सेवा काही काळासाठी स्थगित केली आहे. भारताच्या चीनमधील दूतावासाने या निर्णयाची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतामध्ये जाणे अपरिहार्य असणाऱ्यांना भारतीय दूतावास किंवा वकिलातीशी संपर्क करण्याची सूचना करण्यात आली आहे.
केरळमध्ये 'करोना'चा तिसरा रुग्ण आढळला
नौगावमधील रहिवासी अभिषेक सिंह राजपूत चीनमध्ये राहून एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. अभिषेक २० दिवसांपूर्वीच घरी परतला होता. परत आल्यापासूनच त्याला सर्दी-ताप होता. तो तपासणीसाठी रुग्णालयात गेला तेव्हा त्याला स्वाईन फ्लूसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डात भरती करण्यात आलं. रविवारी दुपारी तो अचानक रुग्णालयातून फरार झाला.
रुग्णाने पळ काढल्याचं लक्षात येताच रुग्णालय प्रशासनामध्ये खळबळ माजली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि रविवारी रात्री ९ वाजता अभिषेकला पुन्हा त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. अभिषेकला पुन्हा एकदा रुग्णालयात नेण्यात आलं. तो १४ जानेवारीलाच भारतात परतला आहे.
चीनमधून आणखी ३२३ भारतीयांना परत आणलं
भारतीयांची चीनमधून सुटका
एअर इंडियाच्या विशेष विमानाने रविवारी चीनच्या वुहान शहरातून ३२३ भारतीय आणि मालदीवच्या सात नागरिकांना रविवारी भारतामध्ये आणण्यात आलं. चीनमधील भारतीयांना घेऊन येणारे हे एअर इंडियाची दुसरे विमान आहे. चीनमधून आणण्यात आलेल्या या भारतीयांपैकी कोणालाही संसर्ग झालेला नसल्याचे चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून '३२३ भारतीय आणि मालदिवच्या नागरिकांची सुटका करण्यात आली. या मोहिमेमध्येही शेजारी देशांची अग्रक्रमाने मदत हे ध्येय ठेवण्यात आले,' असे म्हटले आहे.
करोनाः चीनमध्ये जाणे टाळा, केंद्र सरकारची सूचना
ई-व्हिसा सेवा स्थगित
करोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्यानंतर, भारताने चिनी प्रवासी आणि चीनमध्ये राहणाऱ्या अन्य देशांच्या नागरिकांसाठी असणारी ई-व्हिसा सेवा काही काळासाठी स्थगित केली आहे. भारताच्या चीनमधील दूतावासाने या निर्णयाची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतामध्ये जाणे अपरिहार्य असणाऱ्यांना भारतीय दूतावास किंवा वकिलातीशी संपर्क करण्याची सूचना करण्यात आली आहे.