नवी दिल्ली: करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या मृत व्यक्तीच्या मृतदेहामुळे करोना विषाणू पसरतो का?... याचे उत्तर आहे, 'नाही'. देशातील प्रतिष्ठित एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या डॉक्टरांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. करोना विषाणू हा शिंकणे आणि खोकण्यामुळे पसरतो असे त्यांचे म्हणणे आहे. हा विषाणू संसर्ग झालेल्या मृत व्यक्तीच्या मृतदेहातून पसरत नाही असे ते म्हणतात.
चीन मधील वुहान येथे मृत पावलेल्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आलेले नव्हते. अंत्यसंकारानंतर १४ दिवसांनंतर त्यांच्या कुटुंबीयांना फक्त अस्थी देण्यात आल्या होत्या, अशा प्रकारच्या बातम्या वुहानमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेहाला स्पर्श करणे तर दूरच, परंतु पाहायला देखील दिले गेले नव्हते असेही वृत्त ऐकायला मिळाले आहे.
भारतात दोन व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय देखील संभ्रमात होते. आपण मृतदेह स्वीकारायचे की नाही, असा प्रश्न त्यांच्याही मनात होता.
करोना राष्ट्रीय आपत्ती; मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत
याबाबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. करोना विषाणू मृतदेहांमार्फत पसरत नाही असे त्यांनी सांगितले. हा विषाणू रेस्पायरेटरी सिक्रेशनमुळे (श्वसन स्राव) पसरतो, तसेच हा विषाणू रुग्ण खोकला तरच पसरतो. म्हणून, संसर्ग झालेल्याच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात कोणतीही अडचण किंवा धोका नसल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.
करोना विषाणूच्या भीतीमुळे लोक रस्त्यांवर मास्क लावून फिरताना दिसत आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार लोकांची भीती घालवण्यासाठी जनजागृतीही करत आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केंद्र तसेच राज्यांमधील सरकारांनीही केले आहे.
करोना Live: तेलंगणमध्ये आढळला नवा रुग्ण
देशभरात एकूण ८४ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पैकी १० रुग्ण बरे झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक कर्नाटक आणि एक दिल्लीतील रुग्णाचा समावेश आहे.
सरकारने या विषाणूला अटकाव करण्यासाठी पावले उचलली असताना, दुसरीकडे अनेक लोक निष्काळजीपणे वागत असल्याचेही दिसत आहे. तसेच अनेक लोकांमध्ये विविध प्रकारचे गैरसमजही पसरले आहेत.
असेच एक उदाहरण आज (शनिवार) आढळले. आपल्या पतीला करोनाचा संसर्ग झाल्याचे कळल्यावर दोघांना स्वतंत्र ठेवण्यात आले. मात्र स्वतंत्र राहण्याचे सोडून ही महिला पळूनच गेली. आग्रा येथील ही महिला इटलीमध्ये पतीसोबत हनीमून साजरा केल्यानंतर बेंगळुरूला परतली होती. त्यानंतर तिच्या पतीला करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर त्या दोघांना अलग ठेवण्यात आले. मात्र स्वत:ची तसेच हजारो लोकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडत ती बाहेर पडली आणि विमान पकडून दिल्लीला गेली. त्यानंतर ट्रेनद्वारे ती आग्र्यातील माहेरी पोहोचली. अशाच प्रकारे अलग ठेवण्यात आलेले अनेक लोक पळून गेल्याचेही प्रकार घडले आहेत.
करोनानंतर आला बर्ड फ्लू; कोंबड्यांची अंडी जाळणार
बेजबाबदार लोकांना पाहून मोदी सक्रिय
अशा बेजबाबदार लोकांना पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) सक्रिय झाले. आपल्याला संसर्ग झाल्याचे कळल्यावर लोकांनी घरात राहायला हवे आणि तसे करणए का गरजेचे आहे, याची माहितीच पंतप्रधान मोदी यांनी एका ट्विटद्वारे दिली. ही महत्त्वाची माहिती असून ती काळजीपूर्व वाचा....असे पंतप्रधान मोदी यांनी याबाबतच्या सूचना करताना म्हटले आहे.
घरात स्वतंत्र राहण्याचा अर्थ आपले आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण करणे असा होतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही म्हटले आहे.
चीन मधील वुहान येथे मृत पावलेल्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आलेले नव्हते. अंत्यसंकारानंतर १४ दिवसांनंतर त्यांच्या कुटुंबीयांना फक्त अस्थी देण्यात आल्या होत्या, अशा प्रकारच्या बातम्या वुहानमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेहाला स्पर्श करणे तर दूरच, परंतु पाहायला देखील दिले गेले नव्हते असेही वृत्त ऐकायला मिळाले आहे.
भारतात दोन व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय देखील संभ्रमात होते. आपण मृतदेह स्वीकारायचे की नाही, असा प्रश्न त्यांच्याही मनात होता.
करोना राष्ट्रीय आपत्ती; मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत
याबाबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. करोना विषाणू मृतदेहांमार्फत पसरत नाही असे त्यांनी सांगितले. हा विषाणू रेस्पायरेटरी सिक्रेशनमुळे (श्वसन स्राव) पसरतो, तसेच हा विषाणू रुग्ण खोकला तरच पसरतो. म्हणून, संसर्ग झालेल्याच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात कोणतीही अडचण किंवा धोका नसल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.
करोना विषाणूच्या भीतीमुळे लोक रस्त्यांवर मास्क लावून फिरताना दिसत आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार लोकांची भीती घालवण्यासाठी जनजागृतीही करत आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केंद्र तसेच राज्यांमधील सरकारांनीही केले आहे.
करोना Live: तेलंगणमध्ये आढळला नवा रुग्ण
देशभरात एकूण ८४ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पैकी १० रुग्ण बरे झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक कर्नाटक आणि एक दिल्लीतील रुग्णाचा समावेश आहे.
सरकारने या विषाणूला अटकाव करण्यासाठी पावले उचलली असताना, दुसरीकडे अनेक लोक निष्काळजीपणे वागत असल्याचेही दिसत आहे. तसेच अनेक लोकांमध्ये विविध प्रकारचे गैरसमजही पसरले आहेत.
असेच एक उदाहरण आज (शनिवार) आढळले. आपल्या पतीला करोनाचा संसर्ग झाल्याचे कळल्यावर दोघांना स्वतंत्र ठेवण्यात आले. मात्र स्वतंत्र राहण्याचे सोडून ही महिला पळूनच गेली. आग्रा येथील ही महिला इटलीमध्ये पतीसोबत हनीमून साजरा केल्यानंतर बेंगळुरूला परतली होती. त्यानंतर तिच्या पतीला करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर त्या दोघांना अलग ठेवण्यात आले. मात्र स्वत:ची तसेच हजारो लोकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडत ती बाहेर पडली आणि विमान पकडून दिल्लीला गेली. त्यानंतर ट्रेनद्वारे ती आग्र्यातील माहेरी पोहोचली. अशाच प्रकारे अलग ठेवण्यात आलेले अनेक लोक पळून गेल्याचेही प्रकार घडले आहेत.
करोनानंतर आला बर्ड फ्लू; कोंबड्यांची अंडी जाळणार
बेजबाबदार लोकांना पाहून मोदी सक्रिय
अशा बेजबाबदार लोकांना पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) सक्रिय झाले. आपल्याला संसर्ग झाल्याचे कळल्यावर लोकांनी घरात राहायला हवे आणि तसे करणए का गरजेचे आहे, याची माहितीच पंतप्रधान मोदी यांनी एका ट्विटद्वारे दिली. ही महत्त्वाची माहिती असून ती काळजीपूर्व वाचा....असे पंतप्रधान मोदी यांनी याबाबतच्या सूचना करताना म्हटले आहे.
घरात स्वतंत्र राहण्याचा अर्थ आपले आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण करणे असा होतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही म्हटले आहे.