अ‍ॅपशहर

करोना: शीख धर्मगुरूच्या संपर्कात आल्याने १५ हजार लोक क्वारंटीन

शीख धर्म प्रवचनकार बलदेव सिंग यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे १५,००० लोकांना क्वारंटीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युरोप दौऱ्यावरून आलेल्या सिंग यांचा करोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाला. त्यांना क्वारंटीनच्या सूचना असतानाही त्यांनी न जुमानता गावोगावी आपली प्रवचने सुरूच ठेवली. दरम्यानच्या काळाच हजारो लोक त्यांच्या संपर्कात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2020, 10:08 pm
अमृतसर: बलदेव सिंग या ७१ वर्षीय शीख धर्म प्रवचरकारांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास १५ हजार लोकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. बलदेव सिंग हे युरोपच्या दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी पंजाब राज्यातील अनेक गावांमध्ये प्रवचन दिले होते. युरोपच्या दौऱ्यानंतर क्वारंटीन राहण्याची सूचना धुडकावून सिंग यांनी गावोगावी भेटी देत प्रवचने दिली होती. त्यानंतर आजारी पडेपर्यंत त्यांनी आपली प्रवचने सुरूच ठेवली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पंजाबात १५ हजार लोक क्वारंटीनमध्ये


प्रवचनकार बलदेव सिंग यांच्या संपर्कात आलेल्या तब्बल १९ लोकांना करोनाची लागण झाल्याचे पोलिस उपायुक्त विनय बुबलानी यांनी माहिती देताना सांगितले. या बरोबरच आणखी २०० लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे.

बलदेव सिंग यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ज्या गावांमध्ये सिंग यांनी दौरा केला, ती १५ गावे १८ मार्च या दिवशी सील करण्यात आली. या १५ गावांमध्ये सुमारे १५ हजार ते १८ हजार लोक असू शकतील, अशी माहिती बंगा जिल्ह्याचे वरिष्ठ दंडाधिकारी गौरव जैन यांनी सांगितले.

युरोपच्या दौऱ्यावरून आल्यानंतर होम क्वारंटीन व्हावे अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या असतानाही आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत त्यांनी अनेक गावांचा दौरा केला. त्यांच्या या दोन सहकाऱ्यांनाही नंतर करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सिंग हे आजारी पडेपर्यंत प्रवचनाचे कार्यक्रम करत राहिल्याचीही माहिती मिळत आहे.

सिंग यांच्या मृत्यूनंतर धक्का बसलेले कॅनडातील लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांनी सिंग यांच्यावर एक गाणे तयार केले आहे. 'मैं गुरबक्षी गवाच्चा इटली तो आया हा... खतरे दी विच पता, मेरा दुधां तोत्ते नू' हे गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसांच्या कालावधीत २.३ दशलक्षाहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

करोना: व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमीनवर गुन्हा दाखल

दरम्यान, भारतात देशव्यापी लॉकडाऊन सुरू असून लॉकडाऊनचा आजचा नववा दिवस आहे. आतापर्यंत गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२८ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या १९६५ इतकी झाली आहे, तर आतापर्यंत ५० रुग्णांचा मृत्यू झाला असून १५१ लोक बरे झाले आहेत. या बरोबरच गेल्या २४ तासांमध्ये करोनाच्या एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनाविरुद्ध एकजुटीने लढाई करू या: पंतप्रधान मोदी

लॉकडाऊन गरजेचे, मात्र अंमलबजावणीची पद्धत चूक- सोनिया गांधींचे टीकास्त्र

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज