अ‍ॅपशहर

करोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन पुरेसे नाहीः राजन

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणं अतिशय अवघड आहे. लॉकडाऊनमुळे गरीबांच्या समस्या आणखी वाढतील. केंद्र सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्याने देशाची अर्थव्यवस्था आणखी ढासळली आहे. कोट्यवधी लोकांना आपल्या घरातच राहण्याची वेळ आलीय. यामुळे अनेकांसमोर अन्न आणि औषधांसारख्या मूलभूत समस्या निर्माण झाल्या आहेत, असं रघुराम राजन यांनी ब्लुमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2020, 12:47 am
नवी दिल्लीः करोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी फक्त देशव्यापी लॉकडाऊन पुरेसा नाहीए. पूर्वीसारखं आता नागरिकांची घरांमध्ये अंतर उरलेलं नाही. सर्वत्र दाटीवाटी झाली आहे. मग झोपडपट्टी असो की वाड्यावस्त्या. अशा भागांमध्ये लोक एकत्र राहतात. यामुळे लॉकडाऊनचा किती फायदा होणार? असं म्हणत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी चिंता व्यक्त केलीय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raghuram-rajan


गरीबांसमोर मोठे आव्हान

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणं अतिशय अवघड आहे. लॉकडाऊनमुळे गरीबांच्या समस्या आणखी वाढतील. केंद्र सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्याने देशाची अर्थव्यवस्था आणखी ढासळली आहे. कोट्यवधी लोकांना आपल्या घरातच राहण्याची वेळ आलीय. यामुळे अनेकांसमोर अन्न आणि औषधांसारख्या मूलभूत समस्या निर्माण झाल्या आहेत, असं राजन यांनी ब्लुमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.

गडकरी, जावडेकरांवर महाराष्ट्राची जबाबदारी, करोनाच...

राहुल गांधींनी मोदी सरकारची स्तुती केली, म्हणाले....

करोनाविरोधी लढाईत पायभूत सुविधांचा अडथळा

करोना व्हायरसचा सामना करताना पायाभूत सुविधा सक्षम असणं गरजेचं आहे. पण देशात पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. करोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच यंत्रणांचा वापर करणं आवश्यक बनलं आहे, असं रघुराम राजन यांचं म्हणणं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज