अ‍ॅपशहर

coronavirus india : करोनाची दुसरी लाट का जास्त धोकादायक आहे? एम्सच्या संचालकांनी सांगितलं कारण

देशात करोनाची दुसरी लाट सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळेच रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचं बोललं जातंय. आता दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी करोनाची दुसरी लाट किती धोकादायक आहे, यावर माहिती दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2021, 7:54 pm
नवी दिल्लीः देशात करोनाचा संसर्गाचे रुग्ण गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी अधिक वेगाने ( coronavirus surge in india ) वाढत आहेत. देशात करोनाचीही दुसरी लाट असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. आता दिल्लीतील एम्सचे संचालक ( aiims director ) डॉ. रणदीप गुलेरिया ( dr randeep guleria ) यांनी करोनाची ही दुसरी लाट किती ( corona second wave ) धोकादायक आहे? यावर माहिती दिली आहे. करोना प्रादुर्भाव वाढवणारा सार्सकोव-2 (SARS-Cov-2) हा नवीन स्ट्रेन संसर्ग पसरवण्यात आधीच्या स्ट्रेनपेक्षा अधिक धोकादायक आहे, असं गुलेरिया यांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus india
करोनाची दुसरी लाट का जास्त धोकादायक आहे? एम्सच्या संचालकांनी सांगितलं कारण


देशातील करोनाची रुग्णसंख्या गेल्या महिन्यापासून अतिशय वेगाने वाढत आहेत. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून देशात १ लाखांवर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. या स्थितीत कुठलीही सुधारणा न झाल्यास आपल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागेल. प्रशासन आणि संस्थांनी प्रत्यक्षात कोविडसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत, असं गुलेरिया म्हणाले.

करोना रुग्णामुळे संसर्गाचा धोका आता ८० ते ९० टक्के

गेल्या वर्षाच्या तुलनेत करोनाचे आता आढळून येणारे रुग्ण हे अधिक संसर्ग पसरवत आहेत. आधी एक रुग्ण आपल्या संपर्कात येणाऱ्या ३० ते ४० टक्के लोकांना बाधित करत होता. आता हे प्रमाण ८० ते ९० टक्यांवर गेले आहे. म्हणजे आता आधीच्या तुलनेत दुपटीहून अधिक लोकांना करोना संसर्गाचा धोका आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव करणारे सार्ककोव-२ व्हायरसचे जगात अनेक व्हेरियंट आढळून येत आहेत. यात यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचे व्हेरियंट अधिक धोकादायक आहेत. दिल्लीत यूके आणि दक्षिण आफ्रिकेतील करोनाच्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. पंजाबमध्येही यूके व्हेरियंट आहे.

Sputnik V : रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' लसीला भारतात मंजुरी, देशातील तिसरी लस
करोनावरील लस घ्या, सोशल डिस्टन्सिंग गरजेचं

नागरिकांनी लवकरात लवकर करोनावरील लस घ्यावी. लसीमुळे करोनावर नियंत्रण आणता येऊ शकते. पण ही लस करोनाविरोधात पूर्णपणे सुरक्षित आहे, असंही नाही. लसीमुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे तुमचे संसर्गापासून संरक्षण होते. तसंच मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

coronavirus maharashtra : करोनाचा संसर्ग रोखण्यात महाराष्ट्र अपयशी, केंद्राने

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज