अ‍ॅपशहर

coronavirus : महाराष्ट्राने चिंता वाढवली; करोनाचे देशात सलग दुसऱ्या दिवशी १८ हजारांवर नवीन रुग्ण

करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. खास करून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रात आरोग्य पथक पाठवले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2021, 12:21 pm
नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा ( coronavirus ) वाढत आहे. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे १८ हजारांहून अधिक नवीन रुग्ण ( new covid 19 cases ) आढळून आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा १८ हजारांवर गेला आहे. करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या शुक्रवारी १८७६५ इतकी होती. आता शनिवारी १८,७११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. १४,३९२ जण करोनानूत बरे झाले आहेत. तर १०० जणांना मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी २४ तासांत १० हाजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात आता अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,८४,५२३ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus india
महाराष्ट्राने चिंता वाढवली; करोनाचे देशात सलग दुसऱ्या दिवशी १८ हजारांवर रुग्ण


सलग पाचव्या दिवशी रुग्णांची संख्या वाढती

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सलग पाचव्या दिवशी वाढली आहे. देशात सध्या १,८४, ५२३ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. ही संख्या संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत १.६५ टक्के आहे. देशात आतापर्यंत १,०८,६८,५२० इतके नागरिक करोनातून बरे झाले आहेत. देशात करोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी ही ९६.९५ इतकी झाली आहे. तर मृत्यूदर हा १.४१ टक्के इतका आहे.

Assembly Elections : करोना लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो; EC कडून केंद्राला 'आचारसंहितेची लस'

पंजाबच्या ४ जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी

करोनाचे रुग्ण वाढत असल्याले पंजाबमधील ४ जिल्ह्यांत शनिवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जालंधर, एसबीएसनगर, होशियारपूर आणि कपूरथला या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या जिल्ह्यांत रात्री ११ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

'सीमेवर ज्यांची मुलं जीव ओवाळून टाकतात, त्यांच्यासाठी दिल्लीत खिळे पांघरलेत'

महाराष्ट्र, पंजाबमध्ये केंद्राचे पथक

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये करोना रुग्ण अतिशय वेगाने वाढत असल्याने केंद्र सरकारने आरोग्य पथकं रवाना केली आहेत. ही पथकं करोनाच्या स्थितीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासह राज्याच्या आरोग्य विभागांना सहकार्य करतील, असं केंद्राने म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज