वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेली फौजदारी तक्रार मंगळवारी दिल्लीतील न्यायालयाने फेटाळली.
दिल्लीच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे टाकल्यानंतर केजरीवालांनी ट्विटरवरून मोदींवर केलेली डरपोक आणि मनोरुग्ण ही टीका मानहानीकारक आणि देशद्रोही आहे, अशी तक्रार दाखल झाली होती. केजरीवालांनी राज्याची शांतता भंग करण्यासाठी किंवा द्वेषाने सरकारच्या सार्वभौम अपमान करण्यासाठी कोणतेही वक्तव्य केले नव्हते.
केजरीवाल यांनी केलेले वक्तव्य सीबीआयनचे टाकलेल्या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर विफल होऊन केलेले होते. त्यामध्ये अशांतता पसरवण्याचा, बंड उभारण्यासाठी हालचाली करण्याचा हेतू नव्हता, असे सांगत महानगर दंडाधिकारी अभिलेष मल्होत्रा यांनी ही तक्रार फेटाळली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेली फौजदारी तक्रार मंगळवारी दिल्लीतील न्यायालयाने फेटाळली.
दिल्लीच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे टाकल्यानंतर केजरीवालांनी ट्विटरवरून मोदींवर केलेली डरपोक आणि मनोरुग्ण ही टीका मानहानीकारक आणि देशद्रोही आहे, अशी तक्रार दाखल झाली होती. केजरीवालांनी राज्याची शांतता भंग करण्यासाठी किंवा द्वेषाने सरकारच्या सार्वभौम अपमान करण्यासाठी कोणतेही वक्तव्य केले नव्हते.
केजरीवाल यांनी केलेले वक्तव्य सीबीआयनचे टाकलेल्या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर विफल होऊन केलेले होते. त्यामध्ये अशांतता पसरवण्याचा, बंड उभारण्यासाठी हालचाली करण्याचा हेतू नव्हता, असे सांगत महानगर दंडाधिकारी अभिलेष मल्होत्रा यांनी ही तक्रार फेटाळली.