अ‍ॅपशहर

india covid : करोनाची कुठलीही लाट मुलांना टार्गेट करणार नाही, आरोग्य तज्ज्ञांचा दावा

करोनाची तिसरी लाट येणार आणि या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं बोललं जातंय. यामुळे काही राज्यांनी तयारीसाठी टास्क फोर्सही नेमला आहे. पण करोनाच्या कुठल्याही लाटेत लहान मुलांना फारसा धोका नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2021, 3:46 pm
नवी दिल्लीः देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर ( covid 19 cases in india ) स्थिती निर्माण झाली होती. आता परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. पण करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला ( coronavirus third wave ) आहे. या लाटेत लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पालकवर्ग चिंतेत आहे. पण सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत हरिया यांनी हे सर्व अंदाज फेटाळून लावले आहेत. लहरिया यांचा टाइम्स ऑफ इंडियात लेख छापून आला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अंदाजापेक्षा कमी धोका आहे. यासंदर्भात पुराव्यांवरून हे समोर येत असल्याचं डॉ. लहरिया म्हणाले. यामुळे पालकांची चिंता कही प्रमाणात कमी होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus children
करोनाची कुठलीही लाट मुलांना टार्गेट करणार नाही, आरोग्य तज्ज्ञांचा दावा


करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना (० ते १८) धोका असल्याचं बोललं जातंय. सिंगापूरमध्ये शाळा बंद करण्यात आल्या. नव्या स्ट्रेनमुळे मुलांवर परिणाम होणार असल्याचं दृष्टीने भारतात तो एक पुरवा म्हणून बघितलं गेलं. पण आपल्याकडील उपलब्ध माहितीवरून या मुद्द्यावर स्पष्टता येते. देशातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जेवढीही नागरिक रुग्णालयात दाखल झाले त्यातील २.५ टक्के ०-१८ वयोगटातील होते. या वयोगटातील देशातील लोकसंख्या ही ४० टक्के आहे. यामुळे मुलांपेक्षा प्रौढांना करोना संसर्गाने गंभीर आजार आणि मृत्युचा धोका हा १०-२० टक्के अधिक आहे. तिसऱ्या किंवा कुठल्याही लाटेत मुलांवर करोनाचा परिणाम होईल, असं जगभरात कुठेही म्हटलं गेलेलं नाहीए, असं डॉ. चंद्रकांत लहरिया यांनी लेखात म्हटलं आहे.

उलट-सुलट दाव्यांमुळे पालकांमध्ये भीती

SARS-CoV-2 चा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. पण कुठल्या वयोगटाला गंभीर स्वरुपाचा आजारात होण्याची क्षमता त्यात नाही. करोनाचा संसर्ग समजणाऱ्या जवळपास प्रत्येक तज्ज्ञांचं हेच म्हणणं आहे. भारतातील बहुतेक बालरोगतज्ज्ञांनीही हेच म्हटलं आहे. तरीही काहीजण वेगवेगळ्या मार्गाने असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. उदा. एप्रिल - मे दरम्यान महाराष्ट्रात १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या ९९,००० मुलांना करोना संसर्ग झाला. मुलांमध्ये ३.३ टक्क्याने संसर्ग वाढला, असा दावा एका टीव्हीवरील वृत्तातून केला गेला. असंच अहमदनगरमध्ये ८ हजार मुलांना (० ते १८) संसर्ग झाल्याचं सांगण्यात आला. मुलांमध्ये संसर्ग आधीच वाढत असल्याचं यातून बोललं गेलं. कारण मुलांना लस दिली नाहीए. यामुळे पालकांमध्ये भीती पसरली, असं डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले.

एप्रिल-मे दरम्यान महाराष्ट्रा करोना संसर्गाचे २९ लाख केसेस आल्या. यात मुलांची संख्या ९९ हजार (० ते १० वय ) होती. या संख्येच्या एकूण ३.५ टक्के एवढी. तर या वयोगटातील लोकसंख्या मात्र २४ टक्के आहे. दुसऱ्या लाटेत रोजच्या केसेसमध्ये ४ पटीचा फरक आहे. अशातही मुलांची ३.३ टक्के ही रुग्ण संख्या इतर वयोगटाच्या तुलनेत कमी आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

करोनावर 'द सीकर'ने केली चीनची पोलखोल, पुणेकर जोडप्याचेही योगदान

coronavirus india : 'घाबरू नका, करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर परिणाम होण्याचे संकेत नाहीत'
'राज्य सरकारांचीही दिशाभूल केली गेली'

करोना संसर्ग असलेल्या ज्या मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं त्यापैकी बहुतेक मुलांना आधीच काहीना काही आजार होता. मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चाइल्ड (MIS-C)एक दुर्मिळ स्थिती जी करोनाच्या आधीही होती. याचा उल्लेख आता बातम्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय. राज्य सरकारांचीही यामुळे दिशाभूल झाली आहे. काही राज्यांनी मुलांसाठी वेगळा टास्क पोर्सही बनवला. करोनाच्या संसर्गाविरोधातील लढाईत आरडारोड करणाऱ्यांवर लक्ष देण्याऐवजी राज्यांनी शास्त्रज्ञांचे सल्ल्यांवर लक्ष दिले पाहिजे, असं डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज