अ‍ॅपशहर

करोनाचं थैमान! यूपी, बिहार, राजस्थानचीही लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल

Lockdown - Night Curfew : उत्तर प्रदेशात कोविड १९ व्यवस्था पाहण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक टीम गठीत करण्याचे दिशा निर्देश दिले आहेत. करोनाला रोखण्यासाठी अनेक राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारत आहेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2021, 6:09 pm
करोना संक्रमणानं देशात थैमान घातलेलं असताना महाराष्ट्र, कर्नाटकनंतर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशातही लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसहीत अनेक कडक निर्बंध जाहीर करण्यात आलेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रासहीत अनेक राज्य अडकत आहेत. त्यामुळे देशातील अनेक महत्त्वाची शहरं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन सदृश्यं नियमांकडे वळली आहेत. एकिकडे वेगानं फैलावत जाणारं करोना संक्रमण रोखण्यासाठी आणि करोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक नागरिकांकडून लॉकडाऊनची मागणी केली जातेय. तर दुसरीकडे निर्बंधांमुळे काम बंद पडणार किंवा निर्बंधांचा परिणाम रोजगारावर होणार म्हणून अनेक सामान्य नागरिक चिंतातूर झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid 19 uttar pradesh bihar rajasthan madhya pradesh new guideline on lockdown night curfew
करोनाचं थैमान! यूपी, बिहार, राजस्थानचीही लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल


​उत्तर प्रदेशात लॉकडाऊनच्या दिवसांत वाढ

उत्तर प्रदेशात करोना संक्रमणाचा वाढता वेग लक्षात घेता अगोदर जाहीर करण्यात आलेल्या शनिवार-रविवारच्या 'विकेन्ड लॉकडाऊन'मध्ये आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आलीय. आता उत्तर प्रदेशात रात्री ८.०० वाजल्यापासून मंगळवारी सकाळी ७.०० वाजेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या दरम्यान केवळ मेडिकल, दवाखाने, रुग्णालय, दूध-फळ-भाज्यांची दुकानं अशा अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील.

याशिवाय उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांत नाईट कर्फ्यूही सुरू आहेच. रात्री ८.०० ते सकाळी ७.०० वाजपेर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील करोना पॉझिटिव्हिटी दर ३० टक्क्यांपर्यंत पोहचलाय. उल्लेखनीय म्हणजे, अलाहाबाद हायकोर्टानं राज्यात १४ दिवस लॉकडाऊन लावण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. परंतु, योगी सरकारनं मात्र याला नकार दिला होता.


​बिहारमध्ये सायंकाळी ४.०० पर्यंत दुकानं सुरू

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये नितिश कुमार सरकारनं बुधवारी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार,

- रात्री ६.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जाहीर केलाय.

- संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू

- आता विवाह सोहळ्यात केवळ ५० जणांना सहभागी होता येईल

- अंत्यसंस्कारात २० जण सहभागी होऊ शकतील

- दुपारी ४.०० वाजेपर्यंत दुकाने सुरू असतील

- औषध व दुधाची दुकाने खुली राहतील

- औद्योगिक आस्थापनांमध्ये बांधकामांचे काम सुरू राहील

- ई-कॉमर्सशी संबंधित सर्व कामं सुरू राहतील

- आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व आस्थापनं व उपक्रम सुरू राहतील

- हातगाड्यांवरून फळ आणि भाज्या विक्रीस परवानगी

- शेती व संबंधित कामे सुरूच राहतील

- रात्री ९.०० वाजेपर्यंत रेस्टॉरंट, हॉटेलमधून जेवण घरी घेऊन जाण्याची परवानगी


​राजस्थानात सायंकाळी ६.०० वाजल्यापासून कर्फ्यू

राजस्थानत गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा गहलोत सरकारनं विकेन्ड कर्फ्यूची घोषणा केलीय. यानुसार, शुक्रवारी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ५.०० वाजेपर्यंत 'विकेन्ड लॉकडाऊन' सुरू राहील. हा आदेश २५ एप्रिल सकाळी ५.०० वाजल्यापासून लागू होईल.

सरकारी आदेशानुसार सोमवारी ते शुक्रवारी सकाळी ६.०० ते ११.०० या वेळेत सर्व खाद्यपदार्थांची दुकाने, किराणा सामान, पीठ गिरणी, गुरांचे खाद्य दुकाने सुरू राहतील. त्याचबरोबर, सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ६.०० ते ११.०० या वेळेत कृषी विनिमय विक्रेत्यांची दुकानं खुली राहतील. दूध व दुग्धजन्य पदार्थांची दुकाने दररोज सकाळी ६.०० ते ११.०० आणि सायंकाळी ५.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत उघडता येतील. मंडई, फळभाज्या, फुलांच्या हार आणि भाजीपाला व फळांच्या गाड्या दररोज सकाळी ६.०० ते ११.०० वेळेत खुल्या राहतील.

​मध्य प्रदेशात पाच शहरांत ३ मेपर्यंत लॉकडाऊन

मध्य प्रदेशात छिंदवाडा, रतलाम, सागर आणि जबलपूरसह भोपाळमध्ये निर्बंधात वाढ करण्यात आलीय. भोपाळमध्ये ३ मे पर्यंत लॉकडाऊनसारखे निर्बंध कायम राहतील. त्याचबरोबर छिंदवाडा, रतलाम, सागर आणि जबलपूरमध्ये ही बंदी १ मे पर्यंत कायम राहील. मार्गदर्शक सूचनांनुसार, अनिवार्य सेवा वगळता सर्व सरकारी व खासगी कार्यालये १० टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीसह सुरू राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी लोकांच्या मेळाव्यास पूर्णपणे बंदी जाहीर करण्यात आलीय.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज