अ‍ॅपशहर

covid vaccination : लसीच्या भीतीने कुठे नदीत उड्या, तर काही म्हणतात, '१ लाख रुपये द्या'

शहरांमध्ये करोनाची लस मिळत नसल्याने नागरिक केंद्रांवर गर्दी करत आहेत. तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील ग्रामीण भागांमध्ये गावकऱ्यांमध्ये लसीबाबत गैरसमज निर्माण झाल्याने लस घ्यायला फारसं कुणी पुढे येत नाहीए. यामुळे सरकारला जनजागृती करावी लागत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2021, 8:18 pm
लखनऊ/ भोपाळः मध्य प्रदेशात सोमवारी मालीखेडी गावात करोनावरील लसीकरणबाबात ( covid vaccination india ) जनजागृती करण्यासाठी गेलेल्या पथवार लाठ्यांनी हल्ला झाला. यात एक जण जखमी झाला. करोनावरी लसीबाबतच्या अफवेतून ही घटना घडली. आता उत्तर प्रदेश अशाच गैरसमज आणि अफवेतून एक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशात लसीकरणासाठी पथक येताच बाराबंकी जिल्ह्यातील गावातील नागरिकांनी थेट नदीत उड्या घेतल्या. लस घेतल्याने मृत्यू होतो, असं काहीचं म्हणणं आहे. तर ही विषारी सुई असल्याची भीती काहींमध्ये आहे. यामुळे ग्रामीण भागात लसीकरणासाठी उत्तर प्रदेश सरकार समोर मोठं आव्हान आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vaccination india
लसीच्या भीतीने कुठे नदीत उड्या, तर काही म्हणतात, '१ लाख रुपये द्या'


मध्य प्रदेशातील ग्रामीण भागांमध्ये लस घेण्यासाठी गावकरी तयार नाहीत. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा मतदारसंघ असलेल्या सिहोर जिल्ह्यातच लसीकरणावरून गावकऱ्यांमध्ये अफवा आणि गैरसमज आहेत. सिहोर जिल्ह्यातील नर्मदेच्या किनारी असलेल्या एका जैत गावातील ही स्थिती आहे.

करोनावरील लसीची भीती जाईना

आपण दोन महिन्यांपूर्वी करोनावरील लस घेतली होती. त्यानंतर आपल्याला ताप आला. सलाइन घेऊन कशीतरी बरी झाले. आता दुसला डोस घेणार नाही, असं एका बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजूर महिलेने सांगितलं. तर बऱ्याच दिवसांपासून आपल्याला बारीक ताप येत आहे. यामुळे आपण लस घेतली नाही, असं दुसऱ्या एका महिलेने सांगितलं. गावामध्ये ग्रामस्थांमध्ये करोनावरील लसीवरून गैरसमज आहेत. यामुळे लसीकरण होत नाहीए. आता हे गैरसमज दूर करून लसी देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ग्राम सचिवांनी सांगितलं.

आश्चर्य! किलोभर वजन असतानाही नवजात बालिकेनं केली करोनावर मात

गावात १७ मे रोजी सातव्यांदा लसीकरण झाले. त्यावेळी गावातील फक्त ४ ग्रामस्थांनी लस घेतली. यामुळे लसीचे डोस वाया गेले. लस घेतल्यावर ताप येतो. यामुळे आम्ही लस घेणार नाही, असं गावकरी सांगतात. तर १ लाख रुपये द्या, तरच आम्ही लस घेऊ, असं काही जण म्हणत असल्याचं आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशात नवे उपमुख्यमंत्री? माजी सनदी अधिकारी शर्मा यांची वर्णी लागण्याची शक्यता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज