अ‍ॅपशहर

निर्दयी बाप! १० महिन्याच्या लेकीला आपटून-आपटून मारलं; कारण वाचून हादराल

Latest Murder News In Punjab : दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशाची रक्षा करणाऱ्या एका निर्दयी सैनिकाने आपल्या पोटच्या पोरीचा जीव घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून याचं कारण वाचल्यास तुम्हालाही धक्का बसेल.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2022, 7:30 pm
पंजाब : पंजाबमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे एका बापाने आपल्या १० महिन्यांच्या निष्पाप मुलीला फरशीवर फेकून मारलं आहे. हे प्रकरण मुक्तसर जिल्ह्यातील रणजीतगड गावचे आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime news marathi


आरोपी वडील हे शिपाई आहेत. सध्या ते अंबाला इथे तैनात आहेत. खुनाच्या गुन्ह्यात आरोपीच्या पालकांच्या नावाचाही समावेश आहे. पोलिसांनी सर्वांविरुद्ध खुनाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी मृत मुलीचे वडील फरार असून पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाला कॅंटमध्ये तैनात असलेल्या सतनाम सिंह या शिपाईचा विवाह लखोके बहराम (फिरोजपूर) गावात राहणाऱ्या अमनदीप कौरसोबत दीड वर्षांपूर्वी झाला होता.

अंघोळ केल्यानंतर १७ वर्षांची तरुणी बेडवर झोपली, सकाळी आढळला मृतदेह...; रात्रीत झालं तरी काय
लग्नानंतर काही दिवसांतच सतनामचे अमनदीप कौरसोबत भांडण सुरू झाले. अमनदीपच्या चारित्र्यावर संशय येऊ लागल्याने वाद वाढतच गेलाा. यादरम्यान, त्याने अमनदीपला घरातून हाकलूनही दिलं होतं. त्यावेळी अमनदीप गरोदर होती. सतनामने पत्नी अमनदीपपासून घटस्फोटासाठी न्यायालयात खटला दाखल केला.

दुसरीकडे, अमनदीपने सतनामची तक्रार लष्कराच्या अधिकाऱ्यांकडे केली. या प्रकरणी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी अंबाला कॅन्टला फोन करून दोघांशी बोलणे केले. दरम्यान, अमनदीप कौरने आपल्या माहेरच्या घरी एका मुलीला जन्म दिला. रहमत कौर असं तिचं नाव ठेवलं. मुलगी झाल्यानंतरही दोन्ही कुटुंबात वाद होत होते.

पृथ्वी फिरत नाहीय धावतेय; २४ तासातला वेग पाहून शास्त्रज्ञांची झोप उडाली, पाहा आता काय होणार!
१२ जुलै रोजी पुन्हा दोघांना बोलावून त्यांच्याशी बोलून दोघांना २० दिवस एकत्र राहण्याचे आदेश दिले. यानंतर सतनामने पत्नी अमनदीप कौरला रणजीतगड गावात आणले. या २० दिवसांतही घरगुती कलह संपलेला नव्हताच. रविवारी संध्याकाळी भांडणत सतनामने अमनदीप कौरच्या हातातून मुलीचा हिसकावत घेतलं, आणि तिचे पाय पकडून तिला जमिनीवर आदळलं.

आवाज ऐकताच सगळ्यांनी तातडीने चिमुरडीला रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. यानंतर आता पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख