अ‍ॅपशहर

पत्नी प्रियकरासह पळाली, खचलेल्या पतीने मुलीसह तिघांना गाडीत बसवलं अन्...; क्षणात झालं होत्याचं नव्हतं

Crime News Today : देशात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता आणखी एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबाने आत्महत्या केली आहे. कुटुंबप्रमुखाने आपली मुलगी, पुतण्या आणि मोठा भाऊ यांना गाडीत बसवून गाडी कालव्यात टाकली. कारमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2022, 2:11 pm
फिरोजपूर : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिथे पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेल्यानंतर पतीने कुटुंबातील तीन सदस्यांसह आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय जसविंदर सिंग उर्फ राजू कुटुंबासोबत बुधवारा वाला मोहल्ला इथे राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून प्रियकरासह पळून गेली होती. त्यामुळे कुटुंबीय नाराज झाले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime today news


मृत जसविंदर सिंग उर्फ राजू याने २ दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून आपली सर्व कहाणी सांगितली होती आणि आत्महत्या केल्याचे सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी जसविंदरने त्याचा ११ वर्षांचा पुतण्या आगम, ११ वर्षांची मुलगी गुरलीन कौर आणि त्याचा मोठा भाऊ हरप्रीत उर्फ बंटू यांच्यासह घळखुर्द कालव्यात कार टाकली. गोताखोरांच्या मदतीने गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली.

शिवसेनेला पडणार मोठं खिंडार, खासदारांच्या दाव्यामुळे राजकारणात वातावरण तापलं
गाडी कालव्यात पडताच आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली. कालव्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार आणि कारमधील प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या अपघातात चौघांचाही मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कार कालव्यात फेकणारा जसविंदरचा मुलगा दिव्यांश आणि भाऊ सोनू यांनी सांगितले की, त्यांचे वडील जसविंदर सिंग उर्फ राजू हे बऱ्याच दिवसांपासून नाराज होते. कारण, त्याची आई दुसऱ्या कुणासोबत पळून गेली होती.

वडील बाथरूमला जाताच बाहेरून लावली कडी अन्..., लेक आणि सुनेचं कृत्य पाहून कोल्हापूर हादरलं...
दुसरीकडे, घलखुर्दचे एसएचओ अभिनव चौहान यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी कार आणि कारमधील लोकांचे मृतदेह शोधून त्यांना बाहेर काढले आहे. चारही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख