लखनौ : भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. मायावती म्हणाल्या, 'जेव्हापासून भाजप सत्तेत आला आहे, तेव्हापासून गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असून, गंभीर गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे.' 'सरकार गुन्हेगारी रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करीत आहे, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. लोकांचे हित लक्षात घेऊन सरकारने काम करणे अपेक्षित आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘उत्तर प्रदेशात गुन्हेगारी वाढली’
भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2019, 4:00 am