अ‍ॅपशहर

लालूंचे षडयंत्र; नितीश कुमारांचा राजीनामा

राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. पण लालूंनीच नितीश कुमारांचं सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, त्यासाठी त्यांनी दिल्लीतून हालचाली सुरू केल्या होत्या, त्यामुळे नितीश कुमारांना राजीनामा देण्याची खेळी खेळावी लागली असल्याचं संयुक्त जनता दलातील सुत्रांनी सांगितलं.

Maharashtra Times 27 Jul 2017, 9:12 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crisis in bihars grand alliance why nitish kumar changed his mind
लालूंचे षडयंत्र; नितीश कुमारांचा राजीनामा


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपसोबत घरोबा केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. पण लालूंनीच नितीश कुमारांचं सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, त्यासाठी त्यांनी दिल्लीतून हालचाली सुरू केल्या होत्या, त्यामुळे नितीश कुमारांना राजीनामा देण्याची खेळी खेळावी लागली असल्याचं संयुक्त जनता दलातील सुत्रांनी सांगितलं.

लालूप्रसाद यादव यांच्या प्रतिनिधींनी नुकतीच दोन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. लालूंच्या मागचा कारवाईचा सिसेमिरा कमी केला तर नितीश कुमारांचे सरकार पाडू, असा प्रस्ताव त्यांनी या मंत्र्यांना दिला होता. तसेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाला नितीश कुमारांकडून त्रास होण्याची शक्यता असल्यानेच त्यांनी सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या, असा आरोप संयुक्त जनता दलाने केला आहे. या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी लालूंच्या या प्रस्तावाची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिली. त्यानंतर नितीश कुमारांना लालूंच्या या षडयंत्राची माहिती मिळाल्याने त्यांनी लालूंच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि त्यात तथ्य असल्याचं त्यांना आढळून आलं, त्यामुळे नितीश कुमार यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन लालूंना चेकमेट केल्याचं सांगण्यात येतं.

तरीही सरकार बनविणे कठिण

नितीश कुमार यांनी भाजपशी घरोबा करून सत्ता स्थापण्याचा दावा केला असला तरी नितीश कुमारांना सरकार बनविणे कठिण जाणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं. नितीश कुमार यांच्या या निर्णयाने संयुक्त जनता दलातील आमदार आणि खासदारांचा एक गट नाराज असून या गटाला जवळ करून संयुक्त जनता दल फोडण्याची खेळी लालू करू शकतात, असं त्यांना जवळून ओळखणाऱ्या राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी काळात बिहारच्या राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज