नवी दिल्ली:
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज २७०० कोटींच्या तातडीच्या संरक्षण खरेदी कराराला मान्यता दिली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नव्या करारामुळं भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन जहाजांची भर पडणार आहे. ही जहाजं नौदलाच्या अधिकाऱ्यांना सागरी सुरक्षाविषयक प्रशिक्षण देण्यासाठी वापरात आणली जाणार आहेत. नागरी सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन, बचाव व शोधकार्यासह अन्य विविध कामे करण्याची या जहाजांची क्षमता आहे.
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज २७०० कोटींच्या तातडीच्या संरक्षण खरेदी कराराला मान्यता दिली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नव्या करारामुळं भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन जहाजांची भर पडणार आहे. ही जहाजं नौदलाच्या अधिकाऱ्यांना सागरी सुरक्षाविषयक प्रशिक्षण देण्यासाठी वापरात आणली जाणार आहेत. नागरी सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन, बचाव व शोधकार्यासह अन्य विविध कामे करण्याची या जहाजांची क्षमता आहे.