अ‍ॅपशहर

दहावीत मुलगा नापास; वडिलांनी दिली पार्टी!

दहावी-बारावीत आपली मुलं मेरीटमध्ये आली, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली म्हणून अनेक पालक पार्टी देऊन आनंद साजरा करत असतात. पण मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्याचे रहिवासी सुरेंद्र व्यास यांनी मुलगा दहावी परीक्षेत नापास झाल्याबद्दल आपल्या नातेवाइक आणि मित्रांना पार्टी देऊन आश्चर्याचा धक्काच दिला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2018, 1:24 pm
भोपाळ:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10th-standard-result


दहावी-बारावीत आपली मुलं मेरीटमध्ये आली, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली म्हणून अनेक पालक पार्टी देऊन आनंद साजरा करत असतात. पण मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्याचे रहिवासी सुरेंद्र व्यास यांनी मुलगा दहावी परीक्षेत नापास झाल्याबद्दल आपल्या नातेवाइक आणि मित्रांना पार्टी देऊन आश्चर्याचा धक्काच दिला.

मध्यप्रदेश बोर्डाचे दहावीचे निकाल काल दुपारी जाहीर झाले. या परीक्षेत व्यास यांचा मुलगा आशू नापास झाला. पण यावर नाराजी व्यक्त न करता त्यांनी नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना बोलावून चक्क पार्टीच दिली. मुलाला पुढील परीक्षांसाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी पार्टी दिल्याचं व्यास यांनी सांगितलं.

'परीक्षेत नापास झाल्यामुळे मुलांवर ताण येतो. काही तर आत्महत्याही करतात. पण बोर्डाच्या परीक्षा या आयुष्यातील शेवटच्या परीक्षा नसतात असा संदेश या पार्टीद्वारे मुलांना द्यायचा होता,' असं व्यास म्हणाले. मुलगा नापास झाल्याबद्दल व्यास यांनी पार्टी दिली असताना, निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज