वृत्तसंस्था, दार्जिलिंग
गोरखालँडच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेला बेमुदत संप मंगळवारी २७व्या दिवशी सुरूच होता. या संपामुळे दार्जिलिंग टेकड्यांच्या परिसरात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू लागली आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा संप सुरूच ठेवून जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दार्जिलिंगमधील विविध पक्ष या आंदोलनात सहभागी होणार आहेत. गोरखालँड समर्थक नागरिक १४ जुलैला सिलिगुडी आणि दार्जिलिंगमधील जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी कार्यालयांना घेराव घालणार आहेत. दार्जिलिंगमध्ये १६ जुलैला ‘झोला जुलूस’ काढण्यात येणार आहे. दरम्यान, संपाच्या २७व्या दिवशी मंगळवारी दार्जिलिंग परिसरात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू लागली. पोलिस आणि सुरक्षा दलांनी आंदोलन सुरू असलेल्या भागात गस्त सुरू ठेवली आहे. गेल्या २४ दिवसांपासून या भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. औषध दुकाने वगळता शाळा आणि कॉलेजदेखील बंद आहेत. कलिमपाँग येथे सोमवारी रात्री लष्करी जवान तैनात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्याने यापूर्वी दार्जिलिंग आणि सोनाडा येथे शनिवारी लष्करी जवान तैनात करण्यात आले होते.
‘फुटीरतावाद्यांचे निर्मूलन अवघड’
कोलकाता : ‘फुटीरतावादी शक्तींचे निर्मूलन करणे अवघड असून, विवेकी लोकांनी फुटीरतावाद्यांना दूर करण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करायला हवा,’ असे मत नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले आहे. अस्थैर्य निर्माण करण्याचे प्रयत्न ५०च्या दशकातही झाले होते. मात्र, त्या वेळी लोक एकत्र आले आणि त्यांनी या ताकदींशी मुकाबला केला होता, असेही सेन म्हणाले.
गोरखालँडच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेला बेमुदत संप मंगळवारी २७व्या दिवशी सुरूच होता. या संपामुळे दार्जिलिंग टेकड्यांच्या परिसरात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू लागली आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा संप सुरूच ठेवून जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दार्जिलिंगमधील विविध पक्ष या आंदोलनात सहभागी होणार आहेत. गोरखालँड समर्थक नागरिक १४ जुलैला सिलिगुडी आणि दार्जिलिंगमधील जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी कार्यालयांना घेराव घालणार आहेत. दार्जिलिंगमध्ये १६ जुलैला ‘झोला जुलूस’ काढण्यात येणार आहे. दरम्यान, संपाच्या २७व्या दिवशी मंगळवारी दार्जिलिंग परिसरात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू लागली. पोलिस आणि सुरक्षा दलांनी आंदोलन सुरू असलेल्या भागात गस्त सुरू ठेवली आहे. गेल्या २४ दिवसांपासून या भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. औषध दुकाने वगळता शाळा आणि कॉलेजदेखील बंद आहेत. कलिमपाँग येथे सोमवारी रात्री लष्करी जवान तैनात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्याने यापूर्वी दार्जिलिंग आणि सोनाडा येथे शनिवारी लष्करी जवान तैनात करण्यात आले होते.
‘फुटीरतावाद्यांचे निर्मूलन अवघड’
कोलकाता : ‘फुटीरतावादी शक्तींचे निर्मूलन करणे अवघड असून, विवेकी लोकांनी फुटीरतावाद्यांना दूर करण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करायला हवा,’ असे मत नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले आहे. अस्थैर्य निर्माण करण्याचे प्रयत्न ५०च्या दशकातही झाले होते. मात्र, त्या वेळी लोक एकत्र आले आणि त्यांनी या ताकदींशी मुकाबला केला होता, असेही सेन म्हणाले.