अ‍ॅपशहर

deep sidhu : दीप सिद्धूची शेतकरी नेत्यांना धमकी... 'तुमची पोलखोल सुरू केली ना, तर...'

प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारावरून शेतकरी आंदोलनाला मोठा झटका बसला आहे. आता हिंसाचारावरून अभिनेता दीप सिद्ध हा निशाण्यावर आला आहे. तर दीप सिद्धने आरोप करणाऱ्या शेतकरी नेत्यांना त्यांची पोलखोल करण्याची धम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2021, 8:35 am
नवी दिल्लीः लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्या प्रकरणी आणि आंदोलकांना चिथावल्याच्या आरोप होत असलेल्या पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने ( deep sidhu ) आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. आपल्या फेसबुक पेजवर लाइव्ह करत त्याने थेट शेतकरी नेत्यांना धमकी दिली आहे. तुम्ही मला विश्वासघाती ठरवत आहात. पण मी तुमची पोलखोल सुरू केली ना तर तुम्हाला दिल्लीतून पळायला रस्ताच सापडणार नाही, असं दीप सिद्धू म्हणाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम deep sidhu
दीप सिद्धूची शेतकरी नेत्यांना धमकी... 'तुमची पोलखोल सुरू केली ना, तर...'


माझ्यावर द्वेष पसरवला जात आहे. खोटं बोललं जात आहे. मी बऱ्यांच दिवसांपासून हे सर्व सहन करत आलो आहे. कारण आपल्या संघर्षाला ठेच पोहोचू नये अशी माझी मला इच्छा होती. पण आपण ज्या टप्प्यावर आलात त्या ठिकाणी काही गोष्टी स्पष्ट फार आवश्यक झालं आहे, असं तो म्हणाला.

पहिली गोष्ट म्हणजे २५ तारखेच्या रात्री तरुणांनी व्यासपीठावर आपला संताप व्यक्त केला होता. कारण त्यांना पंजाबहून दिल्ली येथे परेडसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी व्यासपीठावरून वारंवार मोठ्या घोषणा आणि आश्वासनं देण्यात आल्या. आम्ही दिल्लीला आलो आहोत. आणि तुम्ही आम्हाला सरकारने दिलेल्या मार्गावरून जाण्यास सांगत आहात. जे आम्हाला मान्य नाही, असं संतापलेले तरुण म्हणाल्याचं सिद्धूने सांगितलं.

माझ्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ पाहू नये: सिद्धू

त्यावेळी व्यासपीठावरील परिस्थिती अशी झाली होती की पुढाकार घेणाऱ्या नेत्यांनी तिथू पाय काढला. मी मंचावर जाऊन शेतकरी नेत्यांना पाठिंबा दर्शविला. शेतकरी नेते वयोवृद्ध आहेत. ते खूप अस्वस्थ आहेत, म्हणून आम्हाला समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच त्या रात्रीचं माझं भाषण पाहू नये, असं दीप सिद्धू म्हणाला.

आंदोलकांमध्ये रोष होता. यामुळे सामूहिक निर्णय घ्यावा, असं आपण शेतकरी नेत्यांना सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर परेड निघाली. पण पोलिसांनी दिलेल्या मार्गावर ३००० हजार लोकंही नव्हती. सिंघू-टिकरी आणि गाझीपूर सीमेवरून बाहेर पडले आणि लाल किल्ल्याच्या दिशेने निघाले. कोणीही त्यांचं नेतृत्व करत नव्हतं, असा दावा दीप सिद्धूने केला.

'सिंघू सीमा रिकामी करा'... आंदोलक शेतकऱ्यांविरोधात आता नागरिकांचा मोर्चा

मी पोहोचण्यापूर्वीच लाल किल्ल्याचं गेट तोडण्यात आलं होतं. तिथे हजारोंची गर्दी होती. ज्या रस्त्याने लाल किल्ल्यावर पोहोचले त्या रस्त्यावर शेकडो ट्रॅक्टर होते. किल्ल्यात पायीच दाखल झालो. पण तिथे एकही शेतकरी नेता नव्हता. दिल्लीच्या मानगुटीवर पाय ठेवू, अशा मोठ्या वल्गना करणारा एकही नेता तिथे नव्हता, असं दीप सिद्ध म्हणाला.

राकेश टिकैत वादात; म्हणाले, 'लाल किल्ल्यावर पोलिसांनी गोळीबार का केला नाही?'

कृषी कायद्यांना विरोध; संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

काही तरुण आपल्याला घेऊन गेले. तिथे दोन झेंडे पडले होते. एक शेतकऱ्यांचा झेंडा होता आणि दुसरा निशान साहिब. आम्ही जनतेचा रोष दाखवण्यासाठी तिथे दोन झेंडे लावले. पण आम्ही राष्ट्रध्वजाला हात लावला नाही, असं दीप सिद्ध म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज