नवी दिल्ली:
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं दिल्लीकरांना आज मोठी भेट दिली. दिल्लीकरांना २०० युनिटपर्यंत वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं जाहीर केला आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. नव्या निर्णयानुसार, दिल्लीकरांचा २०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. तर, २०१ ते ४०० युनिटपर्यंतच्या वीज बिलावर ५० टक्के अनुदान मिळणार आहे. ही ५० टक्के सवलत बिलाच्या रकमेवर नव्हे, तर वीज वापराच्या युनिटवर मिळणार आहे. म्हणजेच, एखाद्यानं ३०० युनिट वीज वापरल्यास त्याला १५० युनिटसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. विजेच्या वाढत्या बिलांमुळं त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना हा मोठा दिलासा असल्याचं मानलं जात आहे.
निर्णयाची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले, '१५०-२०० युनिट वीज वापरासाठी दिल्लीकरांना हजारो रुपयाचं बिल यायचं. त्यातही सतत वीज पुरवठा खंडित व्हायचा. त्यामुळं मुलांना शिक्षण कसं द्यायचं, असा प्रश्न दिल्लीकरांपुढं होता. आमचं सरकार आल्यानंतर वीज खंडित होण्याचं प्रमाण घटलं आहे.'
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं दिल्लीकरांना आज मोठी भेट दिली. दिल्लीकरांना २०० युनिटपर्यंत वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं जाहीर केला आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. नव्या निर्णयानुसार, दिल्लीकरांचा २०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. तर, २०१ ते ४०० युनिटपर्यंतच्या वीज बिलावर ५० टक्के अनुदान मिळणार आहे. ही ५० टक्के सवलत बिलाच्या रकमेवर नव्हे, तर वीज वापराच्या युनिटवर मिळणार आहे. म्हणजेच, एखाद्यानं ३०० युनिट वीज वापरल्यास त्याला १५० युनिटसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. विजेच्या वाढत्या बिलांमुळं त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना हा मोठा दिलासा असल्याचं मानलं जात आहे.
निर्णयाची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले, '१५०-२०० युनिट वीज वापरासाठी दिल्लीकरांना हजारो रुपयाचं बिल यायचं. त्यातही सतत वीज पुरवठा खंडित व्हायचा. त्यामुळं मुलांना शिक्षण कसं द्यायचं, असा प्रश्न दिल्लीकरांपुढं होता. आमचं सरकार आल्यानंतर वीज खंडित होण्याचं प्रमाण घटलं आहे.'