नवी दिल्ली : 'दिल्ली जल बोर्डा'वर भ्रष्टाचाराचा आरोप करत काही गुंडांनी बोर्डाच्या मुख्यालयावर हल्ला केला. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेडस तोडून या लोकांनी कार्यालयात प्रवेश मिळवला तसंच त्यांनी कार्यालयातही तोडफोड केली. जल बोर्डाकडून याची लेखी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलीय.
प्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीरसिंग बिधुरी यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी जल बोर्डाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. या आंदोलनकर्त्यांच्या हातात काही पोस्टरही होते. या पोस्टरवर 'आम आदमी पक्षा'विरोधात घोषणा लिहिलेल्या होत्या. 'जल बोर्ड हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनलाय. टँकर माफियांचा इथे बोलबाला आहे. लोकांच्या घरी दूषित पाणी पोहचवलं जात आहे. लोकांना टँकर माफियांकडून पाणी खरेदी करून प्यावं लागत आहे', असे अनेक आरोप यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. कार्यालयात ठेवण्यात आलेल्या अनेक वस्तूंची आंदोलकांनी तोडफोड केली. त्यानंतर ते तिथून निघून गेले.
यावर दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष आणि आमदार राघव चड्ढा यांनी भाजप नेत्यांवर गुंडागर्दीचा आरोप केलाय. तसंच 'भाजपच्या गुंडांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना सांगा की शेतकऱ्यांच्या आंदोलनातून माघार घ्यावी, अन्यथा आपच्या नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर असे हल्ले होतच राहतील' अशी धमकी दिल्याचाही आरोप चड्ढा यांनी केलाय.
आम आदमी पक्षाचे आमदार, नेते यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर असे हल्ले केले जातील, अन्यथा असे हल्ले केले जातील - अन्यथा आम आदमी पक्षाचे आमदार, नेते यांच्या आदेशांवर अरविंद केजरीवाल यांना सांगण्याची धमकी भाजपच्या गुंडांनी दिली.
भाजपच्या गुंडांनी कार्यालयाचं मोठं नुकसान केलंय. दिल्ली जल बोर्डाच्या मते, सरकारी कार्यालयात अशा प्रकारची तोडफोड करणं हे अत्यंत निंदनीय आहे. जल बोर्डाकडून या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल' असंही चड्ढा यांनी म्हटलंय.
पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ट्विट करत या घटनेची निंदा केलीय. 'देशाच्या राजधानीत ही काय गुंडागर्दी आहे. अगोदर अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, त्यानंतर मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबावर हल्ला आणि आता राघव चड्ढा यांच्या कार्यालयावर प्राणघातक हल्ला... अमित शाह अजूनही निवडणुकीतील पराभव विसरू शकलेले नाहीत, हे लोक आता रक्तरंजित मारहाणीवर उतरलेत' असं संजय सिंह यांनी म्हटलंय.
'भाजपचे लोक आता दिवसाढवळ्या गुंडगिरी करत घरांमध्ये आणि कार्यालयात घुसत आहेत आणि पोलीस त्यांना संरक्षणाखाली आणत त्यांच्याकडून हल्ल्या करवून घेत आहेत. गुंडागर्दीचं दुसरं नाव भाजप आहे' असं ट्विट उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलंय.
प्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीरसिंग बिधुरी यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी जल बोर्डाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. या आंदोलनकर्त्यांच्या हातात काही पोस्टरही होते. या पोस्टरवर 'आम आदमी पक्षा'विरोधात घोषणा लिहिलेल्या होत्या. 'जल बोर्ड हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनलाय. टँकर माफियांचा इथे बोलबाला आहे. लोकांच्या घरी दूषित पाणी पोहचवलं जात आहे. लोकांना टँकर माफियांकडून पाणी खरेदी करून प्यावं लागत आहे', असे अनेक आरोप यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. कार्यालयात ठेवण्यात आलेल्या अनेक वस्तूंची आंदोलकांनी तोडफोड केली. त्यानंतर ते तिथून निघून गेले.
यावर दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष आणि आमदार राघव चड्ढा यांनी भाजप नेत्यांवर गुंडागर्दीचा आरोप केलाय. तसंच 'भाजपच्या गुंडांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना सांगा की शेतकऱ्यांच्या आंदोलनातून माघार घ्यावी, अन्यथा आपच्या नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर असे हल्ले होतच राहतील' अशी धमकी दिल्याचाही आरोप चड्ढा यांनी केलाय.
आम आदमी पक्षाचे आमदार, नेते यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर असे हल्ले केले जातील, अन्यथा असे हल्ले केले जातील - अन्यथा आम आदमी पक्षाचे आमदार, नेते यांच्या आदेशांवर अरविंद केजरीवाल यांना सांगण्याची धमकी भाजपच्या गुंडांनी दिली.
भाजपच्या गुंडांनी कार्यालयाचं मोठं नुकसान केलंय. दिल्ली जल बोर्डाच्या मते, सरकारी कार्यालयात अशा प्रकारची तोडफोड करणं हे अत्यंत निंदनीय आहे. जल बोर्डाकडून या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल' असंही चड्ढा यांनी म्हटलंय.
पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ट्विट करत या घटनेची निंदा केलीय. 'देशाच्या राजधानीत ही काय गुंडागर्दी आहे. अगोदर अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, त्यानंतर मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबावर हल्ला आणि आता राघव चड्ढा यांच्या कार्यालयावर प्राणघातक हल्ला... अमित शाह अजूनही निवडणुकीतील पराभव विसरू शकलेले नाहीत, हे लोक आता रक्तरंजित मारहाणीवर उतरलेत' असं संजय सिंह यांनी म्हटलंय.
'भाजपचे लोक आता दिवसाढवळ्या गुंडगिरी करत घरांमध्ये आणि कार्यालयात घुसत आहेत आणि पोलीस त्यांना संरक्षणाखाली आणत त्यांच्याकडून हल्ल्या करवून घेत आहेत. गुंडागर्दीचं दुसरं नाव भाजप आहे' असं ट्विट उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलंय.