अ‍ॅपशहर

दिल्ली हिंसाचार हे गृहमंत्रालयाचे अपयशः रजनीकांत

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावरून अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचार गुप्तचर विभाग अर्थात गृहमंत्रालयाचे अपयश आहे, अशी गंभीर टीका रजनीकांत यांनी केलीय. यासोबत रजनीकांत यांनी दिल्लीकर नागरिकांनाही संयमाचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2020, 11:03 pm
नवी दिल्लीः ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावरून अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचार गुप्तचर विभाग अर्थात गृहमंत्रालयाचे अपयश आहे, अशी गंभीर टीका रजनीकांत यांनी केलीय. यासोबत रजनीकांत यांनी दिल्लीकर नागरिकांनाही संयमाचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rajinikanth


दिल्लीत सीएएवरून तीन दिवस हिंसाचार सुरू होता. या हिंसारातील मृतांचा आकडा २० हून अधिक झालाय. तर २०० हून अधिक जण जखमी आहेत. या हिंसाचारावर अभिनेते रजनीकांत वक्तव्य केलंय. 'दिल्ली हिंसाचार हा गुप्तचर विभाग अर्थात केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे. एखाद्या गोष्टीचा निषेध हा शांततेतही करता येतो. त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही. आणि तरीही हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे निपटून काढला पाहिजे', असं अभिनेते रजनीकांत म्हणाले.

दिल्ली हिंसाचाराला केंद्र, अमित शहा जबाबदार: सोनि...

अजित डोभाल स्वतः रस्त्यावर;परिस्थितीचा आढावा

दिल्लीतील हिंसाचारावर याआधी लेखक चेतन भगत यांनीही केंद्र सरकावर टीका केलीय. त्यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचं लक्ष्य केलं. मोदी पाहुण्यांसोबत आहेत आणि दुसरीकडे हिंसाचार सुरू आहे, अशा आशयाचं ट्विट भगत यांनी केलं होतं.

लेखक, कलाकारांकडून दिल्लीतील हिंसाचारावर केंद्र सरकारवर टीका वाढत चालली आहे.

हिंसाचारात अशी बेचिराख झाली दिल्ली, पाहा अंगावर क...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज