नवी दिल्लीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीत भेट दिली. हिंसाचारात पेटवलेल्या गेलेल्या शाळेत राहुल गांधी गेले. 'इथे एकता आणि बंधुभावाची राखरांगोळी केली गेली, अशी टीका करत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
हिंसेच्या राजकारणाने हिंदुस्थान आणि भारत मातेचे नुकसान झाले. शाळा ह्या दिल्लीचे भविष्य आहेत. पण घृणा आणि हिंसेने ते भविष्य नष्ट केले गेले. या हिंसेने भारत मातेचा काहीच फायदा होणार नाही. एकजुटीने काम करण्याची ही वेळ आहे. हिंसा झाली तर जगभरात देशाच्या प्रतिष्ठेचे नुकसान होते', असा टोला राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर लगावला.
दिल्ली दंगल : घर जळालेल्या जवानाचं जनतेला आवाहन
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदारांच्या प्रतिनिधी मंडळाने हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीतील ब्रजपुरी भागाला भेट दिली. वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, कुमारी शैलजा, मुकूल वासनिक, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, खासदार के. सुरक्षा आणि गौरव गोगोई हे काँग्रेसच्या या प्रतिनिधी मंडळात होते. दिल्लीतील हिंसाचारात ४८ जणांचा बळी गेलाय. तर २०० हून अधिक जखमी झालेत.
दरम्यान, दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आज सलग तिसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ झाला. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दिल्ली हिसांचार प्रकरणी त्वरीच चर्चेची मागणी केली. गदारोळामुळे दोन वेळ कामकाज तहकूब झाला. नंतर दिवसभरासाठी संसदेचं कामकाज तहकूब केलं गेलं.
'संसदेत होळीनंतर होणार दिल्ली दंगलीवर चर्चा'
दिल्ली हिंसाचार: PM मोदी भावुक; म्हणाले, 'देशात श...
हिंसेच्या राजकारणाने हिंदुस्थान आणि भारत मातेचे नुकसान झाले. शाळा ह्या दिल्लीचे भविष्य आहेत. पण घृणा आणि हिंसेने ते भविष्य नष्ट केले गेले. या हिंसेने भारत मातेचा काहीच फायदा होणार नाही. एकजुटीने काम करण्याची ही वेळ आहे. हिंसा झाली तर जगभरात देशाच्या प्रतिष्ठेचे नुकसान होते', असा टोला राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर लगावला.
दिल्ली दंगल : घर जळालेल्या जवानाचं जनतेला आवाहन
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदारांच्या प्रतिनिधी मंडळाने हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीतील ब्रजपुरी भागाला भेट दिली. वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, कुमारी शैलजा, मुकूल वासनिक, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, खासदार के. सुरक्षा आणि गौरव गोगोई हे काँग्रेसच्या या प्रतिनिधी मंडळात होते. दिल्लीतील हिंसाचारात ४८ जणांचा बळी गेलाय. तर २०० हून अधिक जखमी झालेत.
दरम्यान, दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आज सलग तिसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ झाला. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दिल्ली हिसांचार प्रकरणी त्वरीच चर्चेची मागणी केली. गदारोळामुळे दोन वेळ कामकाज तहकूब झाला. नंतर दिवसभरासाठी संसदेचं कामकाज तहकूब केलं गेलं.
'संसदेत होळीनंतर होणार दिल्ली दंगलीवर चर्चा'
दिल्ली हिंसाचार: PM मोदी भावुक; म्हणाले, 'देशात श...