अ‍ॅपशहर

दिल्ली दंगल : जामियाच्या गर्भवती विद्यार्थिनीला जामीन मंजूर

Delhi Violence : फेब्रुवारी महिन्यात उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात जामियाची विद्यार्थिनी असलेल्या सफुरा जरगर हिला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 4:31 pm
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनी असलेल्या सफुरा जरगर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय. सफुरा सध्या २३ आठवड्यांची गर्भवती आहे. दिल्ली हिंसाचार प्रकरणात सफुरा हिला अटक करण्यात आली होती. मानवी आधारावर सफुरा हिला जामीन मंजूर करण्यात आलाय. याला केंद्र सरकारनंही समर्थन दिलंय. सफुरा हिला जामीन मंजूर व्हावा ही मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरूनही केली जात होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सफुरा जरगर


दिल्ली हिंसाचार प्रकरणातील चौकशीवर परिणाम होईल अशा कोणत्याही कृत्यात सहभागी न होण्याच्या अटीवर दिल्ली उच्च न्यायालयानं सफुरा हिला जामीन मंजूर केलाय. तसंच तिला दिल्ली सोडण्यासाठीही मनाई करण्यात आली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) फेब्रुवारी महिन्यात उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसाचारात सहभाग असल्याचा आरोप सफुरावर करण्यात आला होता. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठीच्या 'यूएपीए' (Unlawful Activities Prevention Act) कायद्यान्वये सफुरा हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली होती.



सफुरा हिच्या जामीन याचिकेला दिल्ली पोलिसांकडून विरोध करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये आरोपी महिलेविरुद्ध ठोस पुरावे असल्याचं म्हटलंय. सुनियोजित योजना बनवणं आणि त्याच सहभाग घेणं, अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्यानं तिला जामीन मिळू नये, असं मतं पोलिसांनी नोंदवलं होतं.

वाचा : दिल्ली दंगलप्रकरणी आरोपपत्र, कपिल मिश्रांच्या भाषणाचा उल्लेख नाही
वाचा : दिल्लीतील दंगलप्रकरणी आणखी तिघांना अटक

अल्पसंख्यांक आयोगाचा अहवाल

दिल्ली हिंसाचारात ३८ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना कायद्याच्या समर्थकांकडून हस्तक्षेपानंतर हिंसाचार उफाळला होता. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या ईशान्य दिल्लीतील दंगल एकतर्फी आणि सुनियोजित होती असा धक्कादायक खुलासा दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी दिलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर ईशान्य दिल्ली परिसरात हिंसाचार भडकला. या हिंसाचारात मुस्लीम धर्मियांच्या घरांचे आणि दुकानांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं होतं.

वाचा : Fake Alert: या मुलीचा ताहिर हुसैन किंवा दिल्ली हिंसाचाराशी संबंध नाही
वाचा : fake news: सीरियाचा फोटो दिल्ली हिंसाचाराचा म्हणून व्हायरल
वाचा : अंकित शर्मा यांची हत्या 'टार्गेट किलिंग'?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज