अ‍ॅपशहर

दिल्ली हिंसाचाराच्या तपासासाठी दोन SIT

ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे. गुन्हे विभागाची ही एसआयटी असेल. दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) बी.के. सिंह यांच्या देखरेखीखाली एसआयटी काम करेल. तपासासाठी गुन्हे शाखेच्या दोन एसआयटी तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही एसआयटी दिल्ली हिंसाचाराचा तपास करतील.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2020, 8:21 pm
नवी दिल्लीः ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे. गुन्हे विभागाची ही एसआयटी असेल. दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) बी.के. सिंह यांच्या देखरेखीखाली एसआयटी काम करेल. तपासासाठी गुन्हे शाखेच्या दोन एसआयटी तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही एसआयटी दिल्ली हिंसाचाराचा तपास करतील. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसेप्रकरणी ४८ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसंच १००० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Delhi-violence


एसआयटीच्या दोन पथकांचे प्रमुख हे दोन पोलीस उपायुक्त (डीसीपी) असतील. एका एसआयटीचे प्रमुख डीसीपी जॉय ट्रिकी तर दुसऱ्या एसआयटीचे प्रमुख डीसीपी राजेश देव असतील. दोन्ही पथकांमध्ये चार-चार एसीपी असतील. म्हणून एकूण आठ. या पथकांमध्ये तीन-तीन पोलीस निरीक्षक, आणि चार-चार पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश असेल.

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४८ एफआयआर दाखल झाल्या आहेत. याशिवाय इतर २० गुन्हे दाखल झालेले आहेत. एक हजार सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहेत. त्यांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती दिली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी दिली.

राजीव गांधींप्रमाणे सोनियांनीही दिल्लीकरांना चिथा...

दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बद...

हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील स्थिती आता नियंत्रणात आहे. हळूहळू जनजीनव पूर्वपदावर येत आहे. आधीच्या तुलने पीसीआर कॉलही कमी झालेत. अमन कमिटीच्या सहकार्यातून नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. हिंसाचाराची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. हिंसाचाराच्या संपूर्ण तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. ही एसआयटी गुन्हे विभागाची असेल, असं रंधवा म्हणाले.

ईशान्य दिल्लीत सलग तीन दिवस हिंसाचार सुरू होता. या हिंसाचारात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारात जखमी झालेल्या आणखी सह जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर २०० हून अधिक जण जखमी झालेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत १३० जणांना अटक करण्यात आलीय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज