अ‍ॅपशहर

Fadvanis backs Geete : 'खंजीर खुपसणारे... ' अनंत गितेंना फडणवीसांचा पाठिंबा; म्हणाले...

शिवसेनेचे नेते अनंत गिते यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेने गितेंंच्या वक्तव्यावरून सारवासारव केली आहे. राष्ट्रवादीने गितेंवर टीका केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2021, 7:16 pm
पणजीः शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. खासकरून महावाकिसात आघाडीतील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गितेंच्या वक्तव्यामुळे गोची झाली आहे. याचीच संधी साधत भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गितेंचं वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra fadnavis backs anant geete says mva is an unnatural alliance
'खंजीर खुपसणारे... ' अनंत गितेंच्या वक्तव्याला फडणवीसांचा पाठिंबा; म्हणाले...


शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेलं हे महाविकास आघाडीचं सरकार अनैसर्गिक आहे. ते फार काळ टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी अनंत गितेंच्या वक्तव्यावर दिली. अनंत गितेंच्या वक्तव्यावर मी काय बोलणार? पण शिवसेनाला वास्तवाची जाणीव झाली आहे आणि तेच गिते बोलत आहेत, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस हे गोव्याच्या दौऱ्यात आहेत.

अनंत गितेंच्या वक्तव्याशी आपण सहमत आहोत, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात ज्या प्रकारे विरुद्ध विचारसरणी असलेल्या तीन पक्षांची आघाडी झाली ती अनैसर्गिक असल्याचं मी सुरवातीपासून सांगत आलोय. अशा प्रकारचे आघाडी फार काळ टीकत नाही. कारण त्यात सामान्य काहीच नाही. ही अनैसर्गिक आघाडी टीकणार नाही, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणानुसारच झाल्या पाहिजे, याचा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.

Nitin Gadkari: मुंबई ते दिल्ली महामार्ग : सरकारला १२००० कोटींचं वार्षिक उत्पन्न

काय म्हणाले होते अनंत गिते?

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाही. आमचे गुरू हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. ही सत्ता सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत टिकेल. माझा काही त्यांना शाप नाही. पण ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी पवारांच्या घरी जाणार का? तर आपल्याच घरी येणार ना. शिवसेना काँग्रेसच्या विचारांची कधीही होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खूपसून झाला आहे. मुळात दोन काँग्रेस एकत्र होऊ शकत नाही, तिथे शिवसेना कशी काँग्रेसच्या विचारांची होणार, असं अनंत गिते एका कार्यक्रमात म्हणाले.

कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसचा हात धरण्याची शक्यता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज